आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वच्छता सर्वेक्षणांतर्गत शहरातील स्वच्छता मित्र सुरक्षा अभियान लवकरच सुरू केले जाणार असून यासाठी सुमारे १८ लाख रु. खर्च करून १० टँकर तयार केले जात आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाद्वारे शहरातील स्वच्छता व्यवस्थित करण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे. या कामात मनपाकडे उपलब्ध असलेल्या १० टँकरची दुरुस्ती करून ते तयार केले जातील. यात तीन क्लाज (घाण) स्वच्छ करणारे, ३ पाण्याचे, २ साधे व्हॅक्यूम तर २ जटायू टँकर्स असतील. या टँकर्सची दुरुस्ती तसेच रंगरंगोटी केल्यानंतर केंद्र सरकारने पाठवलेल्या म्हणी त्यावर स्टीकर्सद्वारे लावल्या जातील.
स्वच्छता मित्र सुरक्षा अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतेच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे गटर, नाल्यांच्या स्वच्छतेसाठी मदत मिळणार असून, कामही वेगाने पूर्ण होणार आहे.लवकरच राबवणार शॉर्ट निविदा प्रक्रिया टँकर्सच्या दुरुस्तीसह रंगरंगोटीसाठी लवकरच शाॅर्ट निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतरच शहरातील स्वच्छतेच्या कामी हे तयार झालेले टँकर्स वापरले जातील. परिणामी शहराच्या स्वच्छतेत भर पडल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.