आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरखेड ठाणे हद्दीतील घटना‎:अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या‎ पतीचा पत्नीच्या प्रियकराकडून खून‎, मुख्य मारेकऱ्यासह तिघांना अटक

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची बाब माहीत ‎ झाल्यानंतर पती-पत्नीला जाब विचारत होता. ‎ ‎ दरम्यान, पती याच कारणावरुन मानसिक व ‎ ‎शारीरिक त्रास देत असल्याचे पत्नीने तिच्या ‎प्रियकराला सांगितले. त्यामुळे प्रियकराने एका ‎ ‎अल्पवयीनासह तीन मित्रांच्या मदतीने‎ प्रेयसीच्या पतीचा काटा काढला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे ‎ शाखेच्या पथकाने १ मे रोजी उशिरा रात्री मुख्य ‎ ‎ मारेकऱ्यासह तिघांना अटक केली आहे.‎ बबलू ऊर्फ इजाज खान शब्बीर खान पठाण ‎ ‎ (४०), सागर रमेशराव मातकर (३०, दोघेही‎ रा. राजुरवाडी, ता. मोर्शी) आणि कृणाल‎ जानराव उईके (३०, रा. तळेगाव ठाकूर,‎ तिवसा) असे पोलिसांनी अटक केलेल्या‎ आरोपींची नावे आहेत.

बबलूचे एका ३५‎ वर्षीय विवाहित महिलेसोबत मागील अनेक‎ वर्षांपासून प्रेमसंबंध आहे. दरम्यान, काही‎ ‎ ‎ ‎ दिवसांपूर्वी पत्नीचे बबलूसोबत असलेल्या‎ अनैतिक संबंधाची तिच्या पतीला चूणचूण‎ लागली. त्यामुळे महिलेचा पती तिला‎ शारीरिक व मानसिक त्रास देत होता.‎ त्याचवेळी पती त्रास देत असल्याचे पत्नीने‎ तिचा प्रियकर बबलूला सांगितले. त्याचवेळी बबलूने प्रेयसीच्या पतीचा काटा‎ काढण्यासाठी त्याच्या मित्रांच्या मदतीने कट रचला.

सागर‎ मातकर हा बबलुचा आणि त्याच्या प्रेयसीच्या पतीचाही‎ मित्र आहे. दरम्यान २९ एप्रिलला रात्री सागरने मृत‎ व्यक्तीला कॉल करुन आपण दारु पिण्यासाठी जाऊ, असे‎ सांगितले. त्यावेळी सागर व तो व्यक्ती हे दोघे गावालगत‎ असलेल्या कॅनलजवळच्या एका शेतात गेले. त्या ठिकाणी‎ जात असतानाच सागर मातकरने बबलूला कॉल केला.‎ त्यामुळे बबलू त्याचा मित्र कृणाल व एक अल्पवयीन यांना‎ घेऊन त्या शेतात पोहोचले. त्यावेळी बबलूच्या प्रेयसीच्या‎ पतीला घेऊन सागर दारु पित होता.

शेतात पोहोचताच‎ बबलूने दुपट्ट्याच्या सहाय्याने प्रेयसीच्या पतीचा गळा‎ आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह त्याच शेतापासून‎ काही अंतरावर कॅनललगत टाकून निघून गेले. दरम्यान,‎ १ मे रोजी सकाळी शेतकामाला जाणाऱ्या महिलांना एक‎ अर्धवट स्थितीत कुजलेल्या स्थितीतील मृतदेह‎ आढळला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. हा‎ मृतदेह बबलुच्या प्रेयसीच्या पतीचा असल्याची खात्री‎ पटल्यानंतर पोलिसांनी माहिती काढली. त्यानंतर‎ सोमवारी (दि. १) उशिरा रात्री शिरखेड व स्थानिक गुन्हे‎ शाखेच्या पथकाने बबलू व नंतर त्याच्या तीन मित्रांना‎ ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे‎ पोलिसांनी बबलुसह तिघांना अटक केली.

ही कामगिरी‎ एलसीबीचे पीआय तपन कोल्हे, एपीआय विष्णू पांडे,‎ पीएसआय नितीन चुलपार, एएसआय संतोष मुंदाने,‎ बळवंत दाभणे, पंकज फाटे, मनोज टप्पे, शकील‎ चव्हाण, मोहन मोरे, सारंग धापड, चेतन गुल्हाणे, प्रमोद‎ शिरसाट, सरिता चौधरी यांनी केली.‎

बबलू हा तिवसा येथे हमालीचे काम करतो. तर‎ मृत हा गावातच मटण विक्रीच्या दुकानात‎ काम करायचा. गुन्ह्यात बबलूला सहकार्य‎ करणारे त्याचे तीन मित्र त्याच्यासोबत तिवसा‎ येथे हमालीचे काम करतात. बबलूने गळा‎ आवळून खून केला व मृतदेह बाजूला टाकला‎ तसेच त्याच ठिकाणी दारुच्या बाटल्या होत्या.‎ त्यामुळे हा मृत्यू अति मद्य सेवनाने झाल्याचे‎ समोर येईल व आपल्यावर संशय येणार नाही,‎ असे बबलूला वाटले होते. मात्र मृतदेह‎ दिसल्यानंतर पोलिसांनी 12 तासात बबलू व‎ इतर आरोपींना बेड्या ठोकल्या.‎