आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:3200 किमी सायकल चालवून नर्मदा परिक्रमा‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छंद जोपासण्यासाठी शहरातील एका‎ पन्नास वर्षीय छायाचित्रकाराने‎ सायकलने ३२०० किलोमीटर प्रवास‎ करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. हा‎ प्रवास आटोपून नुकतेच ते‎ छायाचित्रकार शहरात पोहोचले.‎ शहरातील गाडगे नगर भागात‎ राहणारे शशी ठवळी मागील पाच‎ वर्षांपासून सायकल चालवतात. रोज‎ सुमारे ४० ते ५० किलोमीटर सायकल‎ चालवणे ही बाब त्यांच्यासाठी नित्य‎ नेमाची आहे. दरम्यान सायकलने‎ लांब पल्ल्याचा प्रवास करायचा, असे‎ त्यांनी ठरवले. यासाठीच काश्मीर ते‎ कन्याकुमारी शशी ठवळी जाणार‎ होते. त्यांच्यासोबत शहरातील एक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ज्येष्ठ सायकलपटू सुद्धा सहभागी‎ होणार होते.

मात्र ऐनवेळी त्यांच्या‎ सहकाऱ्यांना आरोग्याच्या‎ कारणास्तव जाणे शक्य झाले नाही.‎ त्यामुळे ठवळी यांनी नर्मदा परिक्रमा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सायकलने पूर्ण करण्याचे ठरवले.‎ त्यासाठी १ जानेवारी २०२३ रोजी‎ ठवळी यांनी मध्य प्रदेशातील‎ ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमेला‎ सुरुवात केली. परिक्रमेदरम्यान दररोज‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सुमारे १२० ते १५० किलोमीटर‎ सायकल चालवून त्यांनी २९ व्या‎ दिवशी म्हणजेच २९ जानेवारी २०२३‎ ला ओंकारेश्वर येथेच नर्मदा परिक्रमा‎ पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत कोणीही‎ सहकारी नव्हते ही संपूर्ण परिक्रमा ३‎ हजार २०० किलोमीटर झाली‎ असल्याचे ठवळी यांनी सांगितले‎ आहे.‎

वेळेवर ठरवले नर्मदा‎ परिक्रमा करायची‎ नर्मदा परिक्रमा सायकलने करायची‎ असे ठरवले नव्हते. काश्मीर ते‎ कन्याकुमारी प्रवासासाठी जाणार‎ होतो, मात्र सहकारी आरोग्याच्या‎ कारणास्तव येवू शकले नाही म्हणून‎ मी अगदी वेळेवर नर्मदा परिक्रमा‎ करण्याचे ठरवले व सायकलने‎ एकट्यानेच ती पूर्ण केली आहे.‎ -शशी ठवळी.‎ गुजरातमध्ये तीन दिवस‎ करावी लागली प्रतीक्षा‎ नर्मदा परिक्रमा करत असताना‎ मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात‎ अशा तीन राज्यातून प्रवास त्यांनी‎ प्रवास केला. गुजरातमध्ये काटकोर‎ येथे काही अंतर बोटीतून प्रवास करावा‎ लागतो. मात्र वातावरण योग्य‎ नसल्यामुळे दोन दिवस बोट सुरू‎ नव्हती, त्यामुळे दोन ते तीन दिवस‎ त्याच ठिकाणी थांबावे लागले.‎

गुजरातमध्ये तीन दिवस‎ करावी लागली प्रतीक्षा‎ नर्मदा परिक्रमा करत असताना‎ मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात‎ अशा तीन राज्यातून प्रवास त्यांनी‎ प्रवास केला. गुजरातमध्ये काटकोर‎ येथे काही अंतर बोटीतून प्रवास करावा‎ लागतो. मात्र वातावरण योग्य‎ नसल्यामुळे दोन दिवस बोट सुरू‎ नव्हती, त्यामुळे दोन ते तीन दिवस‎ त्याच ठिकाणी थांबावे लागले.‎

नर्मदा परिक्रमादरम्यान शशी ठवळी त्यांच्या सायकलसह‎ वेळेवर ठरवले नर्मदा‎ परिक्रमा करायची‎ नर्मदा परिक्रमा सायकलने करायची‎ असे ठरवले नव्हते. काश्मीर ते‎ कन्याकुमारी प्रवासासाठी जाणार‎ होतो, मात्र सहकारी आरोग्याच्या‎ कारणास्तव येवू शकले नाही म्हणून‎ मी अगदी वेळेवर नर्मदा परिक्रमा‎ करण्याचे ठरवले व सायकलने‎ एकट्यानेच ती पूर्ण केली आहे.‎ -शशी ठवळी.‎

बातम्या आणखी आहेत...