आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाची परिवर्तन‎ यात्रा आज; सामाजिक प्रबोधन करणार‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी)‎ मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या‎ माध्यमातून राज्यस्तरावर सुरू‎ असलेल्या परिवर्तन यात्रेचे आगमन‎ अमरावती येथे ६ फेब्रुवारी रोजी होत‎ आहे. यात्रेतील सहभागी‎ मालटेकडी परिसरात छत्रपती‎ शिवाजी महाराज, चित्रा चौकात‎ महात्मा जोतिबा फुले, इर्विन‎ चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर‎ व गाडगेनगर येथे संत गाडगेबाबा या‎ महामानवांच्या पुतळ्याला‎ अभिवादन करतील. त्यानंतर‎ सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत‎ अभियंता भवन शेगाव नाका, येथे‎ सामाजिक प्रबोधन व जनजागृती‎ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.‎ या कार्यक्रमाला राष्ट्रीय पिछडा‎ वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी‎ विकास पटेल संबोधित करणार‎ आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन‎ जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष‎ मनाली तायडे यांच्या हस्ते होणार‎ आहे. विविध ओबीसी सामाजिक‎ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी‎ याप्रसंगी मनोगत व्यक्त करतील. यात‎ मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष‎ अश्विन चौधरी, महाराष्ट्र सरपंच‎ संघटनेचे राज्याध्यक्ष गजानन बोंडे,‎ राज्य ओबीसी संघर्ष समितीचे‎ जिल्हाध्यक्ष संजय मापले, बारा‎ बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.‎ श्रीराम कोल्हे, संविधानिक भारत‎ राष्ट्र निर्माण अभियानाचे प्रा. प्रफुल्ल‎ कडू, राज्य धोबी परिट महासंघाचे‎ जिल्हाध्यक्ष प्रवीण शेंद्रे, सुतार‎ समाज समन्वय समितीचे‎ जिल्हाध्यक्ष दिलीप आकोटकर,‎ संभाजी ब्रिगेडचे शुभम शेरकर,‎ राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे विवेक‎ कडू उपस्थित राहतील.‎

कार्यक्रमात प्रामुख्याने ओबीसींची‎ जाती आधारित जनगणना, ईव्हीएम‎ घोटाळ्याचा मुद्दा, शेतकऱ्यांसाठी‎ एमएसपी गॅरंटी कायदा, ओबीसींना‎ ५२ टक्के आरक्षण, क्रीमिलेअरची‎ अट रद्द करणे, पदोन्नतीत आरक्षण‎ अशा विविध १९ मुद्यांवर व्यापक‎ चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे या‎ कार्यक्रमाला ओबीसी समाजातील‎ जागृत समाज बांधवांनी मोठ्या‎ संख्येत उपस्थित रहावे, असे‎ आवाहन राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे‎ जिल्हाध्यक्ष व आयोजक सुनील‎ डहाके व जिल्हा युनिटने केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...