आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री रामांनी वनवासात असताना समाजातील लहान-सहान जातींच्या लोकांचे सहकार्य घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. काँग्रेसही अशाच लोकांचे सहकार्य घेऊन मार्गक्रमण करीत आहे. आम्हाला हिंदूविरोधी समजतात. मात्र श्री रामांनी ज्याप्रमाणे लुटमार नव्हे तर परोपकार सांगितला. त्यानुसार वागत आहोत. धनगरांसारखे अनेक समाज आमच्याकडे आशेेने बघत आहेत. त्यामुळे केंद्रातील काँग्रेसचा वनवास लवकरच संपणार, असा आशावाद अमरावती येथील विभागीय धनगर परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. सर्वसामान्यांची फसवणूक करून काही मोजक्या उद्योजकांचे केंद्र सरकार खिसे भरत आहे. याच्या निषेधार्थ मी खासदारकीचा राजीनामा दिला होता. या मुद्यासह महागाई, बेरोजगारीकडे नागरिकांचे लक्ष जाऊ नये म्हणून धार्मिक मुद्दे उकरून काढले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. केंद्र सरकारचे दुटप्पी धोरण असून एकीकडे देशवासीयांची कोरोना लसीची गरज पूर्ण केली जात नाही, तर दुसरीकडे भारतविरोधी कारवाया करणारे शत्रुराष्ट्र पाकिस्तानला मोफत लस वाटली जात आहे. त्याचवेळी देशातील हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध भडकवले जात असल्याची टीकाही पटोले यांनी केली. जातनिहाय जनगणना झाली तर धनगरांना आपोआपच आरक्षण : राज्यात जातनिहाय जनगणना झाली तर धनगरांना कोणापुढेही हात पसरावे लागणार नाहीत. संविधानानुसार त्यांना आपोआपच आरक्षण मिळेल, असे म्हटल्यानंतर आम्ही धनगरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या वेळी म्हणाले. वाझे प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांकडून दिशाभूल
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिव वाझे प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची दिशाभूल केली. त्याचवेळी मी विधानसभा अध्यक्षांना हे दिशाभूल करत असल्याचे म्हटले होते. आता झालेही तसेच तेच सचिन वाझे आता माफीचे साक्षीदार झाले आहेत. यावरून काय समजायचे ते समजते, असा टोमणाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हाणला. या वेळी त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. धनगर परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपटोले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.