आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी:एप्रिलमधील 9 दिवसांत पावसाने‎ नष्ट केली 3200 हेक्टरवरील पिके‎, मूग, भुईमूग, कांदा, हरभरा, गहू, फळपिकांना फटका‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या साधारण दहा ते बारा वर्षांत यंदा‎ प्रथमच एप्रिल महिन्यातील ९ दिवसांत‎ जिल्ह्यात साधारण ६७ मिमी. पावसाची नोंद‎ झाली. या पावसामुळे तब्बल ३२०० हेक्टर‎ शेतजमिनीवरील पिके नष्ट झाली असून, १३‎ गोठ्यांसह २,१०५ इमारतींची पडझड झाली.‎ यापैकी २५ एप्रिलपर्यंतच्या नुकसानासाठी‎ जिल्हा प्रशासनाने २ कोटी ४९ लाख ८ हजार‎ ६६० रुपयांच्या अनुदानाची मागणी केली‎ आहे.

गेल्या चार दिवसांतील सलग‎ पावसामुळे झालेले नुकसान अद्याप निश्चित‎ व्हायचे असल्याने या मागणीच्या रकमेत‎ आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.‎ उन्हाळा असताना गेल्या महिन्यात‎ अचानक वातावरणात बदल झाला. हा बदल‎ हवामान खात्यातर्फे वेळोवेळी‎ कळवण्यातही आला. परंतु शेतातील उभी‎ पिके, बाजारात मोठ्या प्रमाणात तोलाई‎ करुन ठेवलेले अन्न-धान्य आणि इतर‎ चीजवस्तू अगदी वेळेवर स्थलांतरीत करणे‎ शक्य न झाल्याने सामान्य नागरिकांसह‎ शेतकऱ्यांना वादळी पावसाचा फटका सहन‎ करावा लागला.

सध्या बहुतेक शेतांमध्ये‎ उन्हाळी मूग, भुईमूग, कांदा, हरभरा, गहू,‎ टोमॅटो, मिरची, कोहळे आदी‎ भाजीपाल्यासह संत्रा, मोसंबी, डाळींब,‎ आंबा अशी फळपिके आहेत. या सर्व‎ पिकांना वादळी पावसाचा फटका बसला.‎ काही भागात तर नदी-नाले दुथडी भरून‎ वाहिल्याने शेतजमिनीचे पोतही बिघडले.‎ राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा ‎ ‎ प्रशासनाने तातडीने नुकसानीच्या‎ पंचनाम्याचे आदेश दिले. अगदी पहिल्या‎ दिवशी प्राथमिक अंदाज आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांनी कृषी,‎ महसूल व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकांद्वारे‎ अंतीम अहवाल तयार करण्यात आला.

त्यामुळे‎ यंत्रणेला सध्या पावसाची मोजदाद, आवश्यक तेथे‎ आपत्ती व्यवस्थापन आणि झालेल्या नुकसानीचे‎ पंचनामे याच कामांना प्राथमिकता द्यावी लागत‎ आहे. जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या‎ अहवालानुसार एप्रिल महिन्यात पावसाची पहिली‎ नोंद ७ तारखेला घेण्यात आली. अर्थात तो त्या‎ दिवशीच्या २४ तासांतील पाऊस असल्याने प्रत्यक्षात‎ ६ एप्रिल रोजी अमरावतीत पहिला पाऊस पडला.

‎ त्यानंतर ९ एप्रिल, १८ एप्रिल, १९ एप्रिल, २४ एप्रिल,‎ २५ एप्रिल, २७ एप्रिल, २९ एप्रिल आणि ३० एप्रिलला‎ पाऊस कोसळला. अशाप्रकारे एप्रिल महिन्यात‎ तब्बल नऊ दिवस पावसाने हजेरी लावली. या‎ प्रत्येक दिवशी काही भागात पडझड झाली. तर काही‎ भागात शेतिपिकांना पावसाचा फटका बसला.‎ दरम्यान, आतापर्यंतच्या मागणीपैकी १ कोटी १४‎ लाख ६९ हजार रुपये पडझडग्रस्तांना द्यावे लागणार‎ असून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार‎ आहे

असे आहे महिनाभरातील नुकसान
‎ ६ एप्रिल ३०१ ८८४.७९ हे. १,६१,४६,१६०‎ ९ एप्रिल २ -- १,११,० ००‎ १८ एप्रिल ३ -- १,२८,०० ०‎ १९ एप्रिल ३५५ -- ८५,१० ,५००‎ २४ एप्रिल २ -- १३,०००‎ २५ एप्रिल १८७ ९२ हे. --‎ २७ एप्रिल १५७ ६४.४१ हे. --‎ २९ एप्रिल ९१९ ११५३.९४ हे. --‎ ३० एप्रिल १७९ १३२१.९ हे. --‎ एकूण २,१०५ ३,५१७.०४ हे. २,४९,०८,६६०‎

...तर मागणीत पुन्हा वाढ‎

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात‎ कोठे-ना-कोठे पाऊस कोसळत‎ असल्याने त्या नुकसानीचा अंतिम‎ अहवाल तयार व्हायचा आहे. तो‎ झाल्यानंतर त्या नुकसानीची मागणीही‎ राज्य सरकारकडे नोंदवली जाईल, असे‎ जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.‎ सध्याच्या पावसामुळे शेतीपिकांचे‎ नुकसान होत असून हातात आलेली‎ पिकेही खराब झाल्याचा प्राथमिक‎ अंदाज आहे.‎

7 एप्रिलपर्यंतची मदत पोहोचली‎

अवेळी आलेला पाऊस व वादळामुळे‎ शेतीपिकांसह इमारतींची पडझड झाली. जिल्हा‎ प्रशासनाने या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करुन‎ तत्काळ अंतिम अहवाल तयार केला. यापैकी‎ बहुतेक अहवाल शासनाकडे पोचले असून ७‎ एप्रिलपर्यंतच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची‎ रक्कमही संबंधितांच्या खात्यात थेट मंत्रालयातून‎ वळती करण्यात आली आहे. उर्वरित काळातील‎ नुकसानापोटीचे अनुदानही लवकरच दिले जाईल.‎

-डॉ. विवेक घोडके, निवासी‎ उपजिल्हाधिकारी, अमरावती.‎

अशी आहे नऊ दिवसांची‎ पावसाची आकडेवारी‎

३० एप्रिल ४.३ मिमी.‎ २९ एप्रिल २८.८ मिमी.‎ २७ एप्रिल ०.८ मिमी.‎ २५ एप्रिल ४.०० मिमी.‎ २४ एप्रिल ०.७ मिमी.‎ १९ एप्रिल १२.०४ मिमी.‎ १८ एप्रिल ०.६ मिमी.‎ ९ एप्रिल 0.9 मिमी‎ ६ एप्रिल 14.2 मिमी‎

मे महिन्याची‎ सुरूवातही‎ पावसानेच

एप्रिलनंतर किमान मे महिन्यात तरी उन्हाळ्याचे उन पडेल, असे वाटले होते. परंतु एक मे या महाराष्ट्र‎ दिनाच्या शुभारंभाला अर्थात ३० एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसाही पाऊस‎ होताच. त्यानंतर मंगळवार, २ मे आणि आज, बुधवार, ३ मे रोजीही सकाळी पावसाने दर्शन दिले. दुपारनंतर‎ पडलेल्या उन्हाने रस्ते कोरडे झाले. परंतु वातावरणातील गारवा कायमच होता.‎