आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन निर्णय:अमरावती जिल्ह्यातील 3.81 लाख शेतकऱ्यांचे रेशन बंद

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ सरकारी स्वस्त धान्य दुकानातून रेशन प्राप्त करणाऱ्या‎ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. या‎ महिन्यापासून त्यांचे रेशन बंद करण्यात आले असून‎ त्याऐवजी प्रतिव्यक्ती दरमहा १५० रुपये दिले जाणार‎ आहे. दीडशे रुपये महिना म्हणजेच पाच रुपये रोज या‎ सूत्रानुसार ३ लाख ८१ हजार ८६२ शेतकऱ्यांना या‎ निर्णयाचा फटका बसला आहे.‎ या अफलातून निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील‎ गृहिणी प्रचंड नाराज झाल्या असून, पाच रुपयात‎ रोजची शिधा मिळणार कुठे ? असा संतप्त सवाल‎ त्यांनी विचारला आहे. या निर्णयामुळे प्रत्येक घरातील‎ ‘किचन बजेट’ पूर्णत: विस्कळीत होणार आहे.‎ तोकड्या प्रमाणात का असेना परंतु धान्य मिळतेय,‎ म्हणून जेवण तयार होईल, याची आम्हाला खात्री होती.‎ उद्या बोटावर मोजण्याइतपत रकमेत धान्य आणायचे‎ कसे, असा प्रश्न निर्माण झाला असून ही रक्कम‎ काढण्यासाठी बँकेच्या फेऱ्या कुणी माराव्या, असे‎ महिला विचारत आहेत.‎ तर तिकडे कमीशन घटणार असल्यामुळे रेशन‎ दुकानदारांनीही या निर्णयाचा निषेध केला असून‎ त्याविरोधात १६ व २२ मार्च रोजी दिल्लीत मोर्चा‎ काढला जाणार आहे.

प्रतिव्यक्ती दीडशे‎ रुपये जमा करु‎
आतापर्यंत शेतकरी‎ कुटुंबाला प्रतिव्यक्ती एक‎ किलो गहू आणि चार‎ किलो तांदुळ असे वितरण‎ केले जात होते. आता तेही‎ बंद झाले आहे. त्याऐवजी‎ प्रतिव्यक्ती दरमहा दीडशे‎ रुपये (अर्थात दररोज पाच‎ रुपये) एवढी रक्कम‎ संबंधित कार्डधारकाला‎ दिली जाणार आहे.‎ यासाठी त्या कुटुंबातील‎ महिलेच्या नावे बँकेत‎ खाते उघडावे लागणार‎ असून, त्या खात्यातच ही‎ रक्कम वळती केली‎ जाणार आहे.‎ -डी. के. वानखडे,‎ जिल्हा पुरवठा अधिकारी,‎ अमरावती.‎

२०१८ चा निर्णय हाणून पाडला‎
रेशन वितरण प्रणालीतील उणीवा दूर करणे शक्य नसल्याने हळूहळू ही योजनाच‎ बंद करण्याचा सरकारचा घाट आहे. त्यामुळे २०१८ सालीच लागू होणारा हा निर्णय‎ आम्ही सतत आंदोलने करुन हाणून पाडला होता. मात्र, आता पुन्हा तोच मुद्दा‎ सरकारने लादल्यामुळे २२ मार्च रोजी दिल्लीत मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात‎ संघटनेचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधूही सहभागी होणार आहेत.‎ -राजेश आंबुसकर, प्रदेश उपाध्यक्ष, रेशन दुकानदार महासंघ.‎

बातम्या आणखी आहेत...