आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांना निवेदन:‘अचलपूर शहरातील दीक्षाभूमी‎ इमारतीचे नूतनीकरण करा’‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर शहरातील गांधीपुलालगत १९५८ मध्ये‎ स्थापन झालेली दीक्षाभूमी इमारत जीर्ण‎ अवस्थेत आहेत. त्यामुळे या इमारतीचे नव्याने‎ नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात यावे,‎ यासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा,‎ या मागणीसाठी भीम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी‎ पालकमंत्र्यांना निवेदन देऊन साकडे घातले‎ आहे.‎ निवेदनात म्हटल्यानुसार दीक्षाभूमी अचलपूर‎ ही राज्यातील तिसऱ्या क्रमांकावर असलेली‎ दीक्षाभूमी बौद्ध उपासक व उपासिकांचे‎ श्रद्धास्थान आहे. ही दीक्षाभूमी १९५८ साली‎ स्थापन करण्यात आली. अचलपूर- परतवाडा‎ या जुळ्या शहरातील आंबेडकरी अनुयायांचे‎ श्रद्धास्थान आहे.

याठिकाणी विविध धार्मिक,‎ सामाजिक कार्यक्रम होतात. जुळ्या शहरातून‎ भीम जयंती, संविधान दिन, बुद्धपौर्णिमा असे‎ विविध सण उत्सव मिरवणूक पवित्र दीक्षाभूमी‎ येथे विसर्जित होते. अचलपूर मतदारसंघाचे‎ आमदार यांनी आजवर दीक्षा भूमीला‎ कोणताही निधी दिला नसल्याचे भीम ब्रिगेडचे‎ म्हणणे आहे. दीक्षाभूमी इमारत सर्व बाजूंनी‎ शिकस्त झाली आहे.

त्यामुळे नव्याने‎ नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी‎ निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी‎ मागणी भीम ब्रिगेडने निवेदनातून केली आहे.‎ यावेळी अध्यक्ष राजेश वानखडे, विक्रम‎ तसरे, प्रवीण मोहोड, अंकुश आठवले, उमेश‎ कांबळे, नितीन काळे, शरद वाकोडे, केवल‎ हिवराळे, कबीर सारवान, सुशील चोरपगार,‎ अविनाश जाधव, मनोज चक्रे, गौतम सवाई,‎ बाबाराव धूर्वे, सतीश दुर्योधन, विजय मोहोड,‎ विजय खंडारे, राहुल तायडे आदी उपस्थित‎ होते.‎