आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:चैतन्य कॉलनी ते दस्तूरनगर चौकापर्यंतच्या‎ परिसरातील मद्यविक्रीस परवानगी रद्द करा‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जीवनज्योती, चैतन्य किरण‎ नगर, प्रभा कॉलनी ते दस्तूर नगर चौका‎ पर्यंतच्या परिसरात कोणत्याही प्रकारची‎ मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात येऊ नये,‎ या मागणीला घेऊन शुक्रवारी स्थानिक‎ नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎ दिले.‎ निवेदनात म्हटल्यानुसार, जीवन ज्योती‎ कॉलनी येथे प्लॉट क्रमांक अकरामध्ये एक‎ भाग जयस्वाल व्यक्तीकडे आहे.

त्या‎ जागेवर बांधकाम करण्यात आले आहे. या‎ ठिकाणी चिल्लर मद्य विक्रीचे दुकान सुरू‎ होण्याच्या मार्गावर असल्याचे निवेदनात‎ म्हटले आहे. सुरूवातीला याच परिसरात‎ वाइन शॉपी, बार, मद्य विक्रीचे दुकाने सुरू‎ असल्याने आधीच परिसरात नागरिकांना‎ समस्या निर्माण झाली आहे. या परिसरात‎‎‎‎‎‎‎‎ नागरी वस्ती असून, महिलांना त्रास सहन‎ करावा लागत आहे. तसेच शाळा,‎ महाविद्यालय, वसतिगृहही याच परिसरात‎ आहे.

दोन तीन वर्षाच्या कालावधी हत्या‎ सारख्या गुन्ह्याच्या घटना घडल्या आहेत.‎ आता पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या‎ मद्यविक्रीमुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती‎ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक ते‎ दीड किलोमीटर परिसरात नव्याने सुरू‎ होणाऱ्या मद्यविक्रीस परवानगी देण्यात येऊ‎ नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी‎ केली आहे. यावेळी रामकृष्ण हिरुळकर,‎‎‎‎‎‎‎‎ कोकिळा देवळे, देविदास देवळे, अभिजित‎ घाटे, सुरेंद्र खंडेलवाल, नरेंद्र पाल, संजय‎ पाल, कमलकिशोर गुप्ता, कैलास लोणारे,‎ रोहित पाल आदी उपस्थित होते.‎ आगामी काळात आंदोलन : चैतन्य‎ कॉलनी ते दस्तुर नगर चौकापर्यंत मोठया‎ प्रमाणावर वर्दळ असते. यासोबतच महिला,‎ विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे या‎ परिसरात कोणत्याही प्रकारचे मद्यविक्रीच्या‎ दुकानांची परवानगी देण्यात येऊ नये,‎ अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा‎ इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे.‎‎

बातम्या आणखी आहेत...