आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घ्या काळजी:जनावरांनाही उष्माघाताचा धोका‎, पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजनांसह खबरदारीचा पशुपालकांना सल्ला‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुपारच्या वेळी उष्णतामान जास्त‎ असते. जनावरांद्वारे अतिरिक्त काम‎ करून घेतल्यास त्याचा विपरीत‎ परिणाम हा त्यांच्या शरीर तापमान‎ नियंत्रण क्षमतेवर होतो. जनावरांच्या‎ गोठ्यामध्ये योग्य व्यवस्थापन करून‎ तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न‎ करावा.

जिल्ह्यात जवळपास ४ लाख‎ ५० हजारांच्या आसपास पशुधन‎ आहेत. उन्हाच्या झळांनी पशूनांही‎ धोका निर्माण होतो. त्यामुळे‎ पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे‎ आवाहनही पशुसंर्धन विभागाने केले‎ आहे.‎ एप्रिल, मे महिन्यात तापमान हे ३५‎ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास‎ त्यांचा विपरीत परिणाम हा गायी,‎ म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता,‎ प्रजनन व उत्पादकतेवर होऊ शकतो.‎

उन्हाळ्यामध्ये वातावरणातील‎ तापमानामुळे जनावरांच्या शरीराद्वारे ‎ ‎ वातावरणातील जास्त उष्णता ‎ ‎ शोषल्यामुळे किंवा शरीरातील‎ उष्णता उत्सर्जित करण्याच्या‎ प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण झाल्यास‎ किंवा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता ‎ ‎ निर्माण झाल्यास त्याच्या शरीरात या ‎ ‎ वाढलेल्या तापमानामुळे ताण येतो. ‎ ‎ त्यांचे शारीरिक तापमान (१०३ ते ११० ‎ ‎ अंश फॅरानाइट) वाढते. जनावरांची ‎ तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक ‎ ‎ सहन क्षमता कमी पडल्यास‎ शारीरिक तापमानात वाढ होते.

एका ‎ ‎ जागी उभे राहणे, बैचेन होणे, खाली ‎बसणे अशी लक्षणे दिसून येतात. ‎यालाच उष्माघात म्हणतात. वेळीच ‎ ‎ उपचार न केल्यास जनावरेही ‎ ‎ उष्माघातास बळी पडतात. या‎ अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या‎ पशुसंवर्धन विभागाने काही ‎ ‎ खबरदारीच्या सूचना‎ पशुधनपालकांना दिल्या आहेत.‎

अशी घ्यावी‎ खबरदारी‎ ‎

सकाळी व संध्याकाळी ऊन कमी‎ असताना जनावरे चरण्यास‎ सोडावीत. मुबलक प्रमाणात थंड‎ पिण्याचे पाणी द्यावे. बैलांकडून‎ शेतीच्या मशागतीची कामे शक्यतो‎ सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात‎ करून घ्यावीत. अनेकदा जागेअभावी‎ किंवा अन्य कारणाने जनावरे‎ दुपारच्या वेळी भर उन्हात बांधली‎ जातात. याचा परिणाम त्यांच्या‎ आरोग्यावर होतो. त्यांना उन्हाचा‎ चटका बसू नये यासाठी पशुपालकांनी‎ जनावरांची काळजी घ्यावी.

उन्हाच्या‎ ताणामुळे जनावरांची भूक मंदावते.‎ त्यामुळे त्यांना थंड वातावरणात चारा‎ टाकावा, असे आवाहन जिल्हा‎ पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम‎ सोळंके यांनी केले आहे.‎