आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील जांब (जवळा) येथील एका रस्त्याचा वाद गेल्या आठ महिन्यापासून निकाली निघाला नाही. शेवटी त्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबाने शेतातच बुधवार, दि. एक फेब्रुवारी रोजी पासून आमरण उपोषणाला सुरूवात केली.गावातील दोन शेतकऱ्यांनी आठ महिन्यांपूर्वी ज्ञानदेव इंगोले यांच्या शेतात ये-जा करण्याचा रस्ता प्रतिबंधित केला. त्यामुळे त्यांनी शेत वहिवाटीसाठी रस्ता मिळण्याकरिता येथील तहसील कार्यालयात ६ जून २०२२ रोजी अर्ज दिला. त्वरीत रस्ता देण्यात यावा, अशी मागणी सुद्धा शेतकरी कुटुंबाने केली होती.
रस्त्याचा वाद अजूनही तहसिल कार्यालयात सुरूच असून, पाहता पाहता खरीप हंगाम समाप्त झालेला आहे. रब्बी हंगाम सुरू आहे. चालू हंगामामध्ये शेतात चना, कापूस, हळद, तुर आदी महत्वाची पिके उभी आहेत. तेव्हा सदर पिकांचे संवर्धन करणे, पाणी देणे आणि परिपक्व झालेला माल शेतातून घरी आणण्यासाठी गाडी बैलांसह यांत्रिक वाहनांसाठी रस्ता आवश्यक आहे. हा प्रश्न आजूनही प्रलंबित आहे.
त्यामुळे बुधवारपासून जांब येथील शेतात गट नंबर १९ मध्ये आमरण उपोषण सुरू केले. तत्पूर्वी न्यानदेव रामचंद्र इंगोले यांनी एसडीओंच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. निवेदन देवूनही रस्त्याचा प्रश्न जैसे थे असल्याने अखेर कंटाळून जांब येथील ज्ञानदेव इंगोले, दुर्गा इंगोले या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातच सकाळपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.