आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील आणखी १० आमदार एकनाथ शिंदे गटासोबत येणार आहेत. त्यामुळे एकूण ५० आमदारांचा गट स्थापन होईल. या १० पैकी काही शिवसेनेचे, तर काही काँग्रेसचेही असतील. कारण त्यांनाही शिवसेना-राष्ट्रवादीसोबत सरकार नको, असा दावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. त्यांच्याशी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.
शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवार, २२ रोजी पहाटेच सुरतहून गुवाहाटीत दाखल झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या गटात अचलपूर येथील प्रहारचे आमदार व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर धारणी येथील प्रहारचेच आ. राजकुमार पटेलही गुवाहाटीला पोहोचले.
सर्व आमदार स्वमर्जीने आलेत
आमदारांना मारहाण करून डांबून ठेवल्याचा दावा खा. संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारले असता राज्यमंत्री कडू यांनी असे काहीच घडले नसल्याचे स्पष्ट केले. सर्व आमदार स्वमर्जीने येथे आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.