आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभात चौकातील शिकस्त इमारतीमधील तळमजल्यावर असलेल्या राजदीप एम्पोरियमची दुरुस्ती सुरू असताना संपूर्ण दुकानाचा गाळा कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. ३० आॅक्टोबरला झालेल्या या अपघातात पोलिसांनी दुकान मालक, ठेकेदार असे एकूण पाच जण व मनपा झोन क्र. २ चे दोन अभियंता अशा एकूण सात जणांना दोषी ठरवून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. नुकताच हायकोर्टाने मनपाच्या दोन्ही अभियंत्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर या प्रकरणी झालेल्या सुनावणीत पोलिस तपास यंत्रणेवर एकूणच नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिस तपासात हायकोर्टाला ज्या उणिवा आढळल्या त्यानुसार शिकस्त इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणारी एजन्सी तसेच आर्किटेक्चर अभियंत्यांविरोधात गुन्हा का दाखल केला नाही. त्यांचा आरोपींमध्ये समावेश का नाही, असा प्रश्न हायकोर्टाने विचारला आहे. इमारत कोसळल्यामुळे पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी योग्य दिशेने तपास केला जाईल, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास करणारे मनपाचे दोन अभियंता आरोपी ठरतात, त्यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश का करण्यात आला नाही, अशी विचारणा हायकोर्टाने केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाहीे. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.