आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदगाव पेठ एमआयडीसीतील कंपन्यांची वापरात नसलेली शेकडो चौरस फूट जमीन तशीच पडून आहे. उद्योग उभारल्या नंतरही कंपन्यांद्वारे उर्वरित जमिनीचा वापर केला जात नसून ही जमीन जर शासनाने परत घेतली तर त्यावर नवीन उद्योग स्थापन करता येणे शक्य आहे. या कंपन्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करारराम्यानुसार शेतकऱ्यांच्या जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, ज्यांच्याकडे जमिनी उद्योग उभारल्यानंतही शिल्लक आहेत त्यांनी अन्य कोणत्याही उद्योगांना चालना दिली नाही. शेतकऱ्यांच्या मुलांनाही दिली नाही.
त्यामुळेरिकामी असलेली जागा शासनाने परत घ्यावी व त्या जागेवर नवीन उद्योगाला जागा मंजूर करुन द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी कामगार युनियनद्वारे नुकतीच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन करण्यात आली. याप्रसंगी बडनेऱ्याचे आमदार रवी राणा , स्वाभिमानी कामगार युनियनचे शहर अध्यक्ष नीलेश भेंडे, अनुप खडसे, पराग चिमोटे ,अंकुश मेश्राम, श्रीकांत इंगळे ,चंदन जाधव उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.