आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गचे काम पुर्णत्वास जावून दोन वर्षे होत आहेत. या महामार्गावरील दुभाजकावर एका हायमास्टसह १८१ पथ दिव्यांची उभारणी ही खुराणा इंजिनिअरिंग कंपनीकडून करण्यात आली होती. या हायमास्टमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली होती. त्यामुळे आज ना उद्या हे पथदिवे सुरू होतील, अशी अशा नागरिकांना होती, परंतु तांत्रिक कारणामुळे हे पथदिवे शोभेची वस्तू बनले होते. मात्र दोन वर्षांनंतर पथदिवे सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या पथदिव्यांना ट्रान्सफॉर्मरद्वारे कमी दाबाचा पुरवठा व चुकीचे पद्धतीने केलेली ओहरहेड वायरिंगची जोडणी आदी तांत्रिक कारणांमुळे पथदिवे सुरू झाले नव्हते. याबाबत नगर परिषदेने संबंधित कंत्राटदार कंपनीला वेळोवेळी काम पुर्ण करण्यासाठी पत्राद्वारे सूचित केले होते, परंतु कंपनीकडून योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे पालिकेने स्वतःकडे हस्तांतरण करून घेतले नव्हते. दरम्यान नागरिकांचा वाढता रोष पाहता मुख्याधिकाऱ्यांनी अकोला येथील कार्यकारी अभियंता यांना पत्राद्वारे याबाबत अवगत केले. अखेर दोन वर्षांने का होईना १८१ पैकी ११० पथदिवे सुरू झाले आहेत. उर्वरित पथदिवे लवकरच सुरू होतील, अशी माहिती पािलका मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.