आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील चार ते पाच दिवसांपासून वातावरणात गारठा असतानाच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशामधील संभाव्य बर्फर्वृष्टी लक्षात घेता ९ तारखेपासून पुन्हा थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली. मकर संक्रांत होताच उन्हाचा जोर वाढू लागतो.
मात्र या वर्षी फेब्रुवारी महिला सुरू होऊनदेखील अमरावतीकरांना थंडीचा सामना करावा लागत अाहे. त्यातच पुन्हा ९ फेब्रुवारीपासून थंडी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने अमरावतीकरांना आतापासूनच हुडहुडी भरली अाहे. सद्यस्थितीत कमी दाबाचे क्षेत्र कोमोरीन जवळ आहे. त्यातच एक नवीन पश्चिमी चक्रवात रविवारी (दि. ५) पश्चिम हिमालयावर येणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत विदर्भात किमान तापमानात विशेष फरक पडणार नसला, तरी मात्र पुर्व विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहील. सोमवारपासून (दि. ६) पुढील तीन दिवस किमान तापमानात थोडी वाढ होईल. मात्र त्यानंतर उत्तर भारतात होणारी संभाव्य बर्फर्वृष्टी लक्षात घेता थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.