आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी महामंडळाची बस घेऊन जाणाऱ्या एका चालकाला रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली होती. ही घटना चांदूर रेल्वे येथे सात वर्षांपूर्वी घडली आहे. या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) राजेंद्र ताम्हाणेकर यांनी आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय न्यायालयाने मंगळवार, १४ मार्च राेजी दिला आहे. विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू उर्फ नीलेश रमेशराव भालेराव (३२, रा. महालक्ष्मी नगर, चांदूर रेल्वे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात संजू दशरथ पलेरिया (५३, रा. वर्धा) यांनी तक्रार दिली होती.
१ फेब्रुवारी २०१६ रोजी संजू पलेरिया हे वर्धा आगाराची बस घेऊन चांदूर रेल्वे मार्गे अमरावतीला येत होते. दरम्यान सकाळी साडेसहा ते सात वाजताच्या सुमारास चांदूर रेल्वे येथे संजू पलेरिया यांची बस थांबवून पप्पू भालेराव यांनी त्यांच्यासोबत वाद घातला होता. त्यानंतर संजू पलेरिया बस घेऊन अमरावतीत आले. घडलेल्या वादाबाबत त्यांनी अमरावती बस स्थानक परिसरातील पोलिस चौकीत माहिती दिली होती. त्यानंतर तीच बस घेऊन सायंकाळी ते पुन्हा वर्धा येथे जाण्यासाठी निघाले असता त्या बसचा पाठलाग करून भालेरावने चांदूर रेल्वे येथे ती बस पुन्हा थांबवली. त्यावेळी पलेरिया यांना बसच्या खाली ओढून त्याने मारहाण केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.