आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाई:अमरावती जिल्ह्यातील 618 गावांमध्ये‎ उपाययोजना प्रस्तावित, 12 कोटींचा खर्च‎

प्रतिनिधी | अमरावती‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई‎ लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या‎ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती ‎ ‎ आराखडा तयार केला. त्यानुसार १२ ‎ कोटी ४३ लाख ८२ हजार रुपयांच्या ‎ आराखड्यास मंजुरी दिली. यामध्ये ‎ ‎ जिल्ह्यातील ६१८ गावांत विविध ‎ ‎ प्रकारच्या ८०० उपाययोजनांचा‎ समावेश आहे. संभाव्य टँकरची‎ संख्या १९ इतकी प्रस्तावित आहे.‎

विशेष म्हणजे, गतवर्षी २७ ठिकाणी ‎ ‎ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला‎ होता. यंदा मात्र टँकरची संख्या ८ ने‎ घटली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण‎ भागाला दरवर्षी उन्हाळ्यात भीषण‎ पाणी टंचाईची झळ सोसावी लागते.‎ यासाठी जिल्हा परिषदेकडून‎ पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई‎ आराखडा तयार केला जातो. यावर्षी‎ सीईओच्या मार्गदर्शनाखाली १२‎ कोटी ४३ लाख रुपयांचा टंचाई‎ आराखडा तयार केलेला आहे.‎ अन्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने‎ ‎मंजूर केलेला आहे. या‎ आराखड्यानुसार जिल्हाभरातील‎ ६१८ गावात संभाव्य विविध‎ प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित‎ करण्यात आल्या असून टँकरने‎ पाणीपुरवठा होणार आहे.‎

पाणीटंचाई निर्माण होऊ‎ नये याकडे लक्ष‎
पाणीटंचाई आराखडा मंजूर झाला‎ आहे. त्यानुसार उपाययोजना करणे‎ सुरू झाल्या आहेत. विहीर‎ अधिग्रहित करणे मोहीम हाती‎ घेतली आहे. संभाव्य पाणीटंचाई‎ बघता विविध उपाययोजना‎ राबवण्यात येत आहे.‎ -संदीप देशमुख, कार्यकारी‎ अभियंता. जि.प.‎