आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र जिल्ह्यात अजूनही १ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी बँक खात्याची ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या योजनेला आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ देण्याची योजना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या नावाने केंद्र शासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजार ८९५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. हा लाभ असाच सुरू ठेवण्यासाठी सर्वच खाते धारकांनी आपल्या बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठी या पूर्वीचीच मुदत दिली गेली होती. दरम्यान, जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजारांपैकी केवळ १ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असून अद्यापही १ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही. आता ३१ जुलै ही मुदत दिली गेली आहे.
काय आहे ई-केवायसी?
केवायसी ही ग्राहकांच्या पडताळणीची बँकांची एक प्रक्रिया असते. यात आपला ग्राहक
कोण आहे हे बँक जाणून घेते (नो युवर कस्टमर) यालाच संक्षिप्त रूपात केवायसी म्हणतात. भारतात २००२ मध्ये केवायसी सुरू केली गेली. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असलेल्या या प्रक्रियेला ई-केवायसी म्हणतात. आधार कार्ड देऊन ही प्रक्रिया करता येते.
...तर लाभ मिळणार नाही
पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. वर्षात एकूण तीन टप्प्यांत प्रत्येकी दोन हजार रुपये यातून मिळतात. मात्र, आता लाभ मिळणाऱ्या या खात्याची शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही तर हा लाभ बंद पडू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.