आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बोटोणी जंगलात वाघाचा मुक्त संचार असून दि. ३ मार्चला रात्री शिवणाळा येथील शेतकरी कांहू लेतू आत्राम यांची शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या गाईवर वाघाने हल्ला करून ठार केले. शनिवारला शेतकरी शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून जनतेने सावध राहावे असा इशारा वन विभागाने दिला आहे.
बोटोनी परिसरातील मारेगाव झरी तालुक्याच्या हद्दीत वन विभागाचे हजारो हेक्टरचे वनक्षेत्र आहे. या वन क्षेत्राला लागूनच राष्ट्रीय टीपेश्र्वर अभयारण्य येते. हा ठिकाणी असलेले वाघ अन्नाच्या शोधात तालुक्यातील वनक्षेत्रात प्रवेश करतात. यापूर्वी सुध्दा अनेकदा या भागात वाघाने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.