आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथील रहिवासी आशिष पुरणलाल केळकर वय ३३ हा युवक मित्रासह कंपनीचे काम संपल्याने दुचाकीने आळंदी भोसरी रस्त्याने जाताना रस्त्यालगत दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीच्या मागे बसलेला आशिषचा मित्र हा गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आळंदी भोसरी रस्त्यावरील साई मंदिरा जवळ घडली तालुक्यातील पातुर्डा येथील ३३ वर्षीय युवक आशिष केळकर हा पुण्यात एका कंपनीत नोकरी करीत होता कंपनीचे काम आटोपून तो दुचाकीने मित्रासह आळंदी भोसरी रस्त्याने घराकडे जात होता. साई मंदिरा जवळ येताच त्यांची दुचाकी रस्त्यालगत असलेल्या दुभाजकाला जाऊन भिडली.
या अपघातात आशिषचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबाला समजताच त्यांनी घटनास्थळी घेतली. गंभीर अवस्थेत आशिष व त्याचा मित्र दोघांना दवाखान्यात हलविले. परंतु तपासणी करून डॉक्टरांनी आशीषला मृत घोषीत केले. तर गंभीर जखमी असलेल्या मित्रावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. त्याच्यावर पातुर्डा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले, तीन भाऊ आप्त परिवार आहे. आशिष हा घरातील कर्ता व मनमिळाऊ मुलगा होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.