आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित‎:नादुरुस्तकालव्यामुळे‎ शेती पाण्यापासून वंचित‎

जवळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी तालुक्यातील देवगाव प्रकल्पाच्या लोणी‎ उपकालव्याची तब्बल १५ वर्षांपासून दुरुस्ती न केल्यामुळे‎ लोणी व गणगाव या गावातील लाभ क्षेत्रात येणाऱ्या‎ शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील लाभा पासून वंचित राहावे‎ लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.‎ खरीप हंगामात अतिवृष्टीच्या फटक्याने शेतकरी हवालदिल‎ झाला. खरीप हंगामातील पिक हातून गेल्याने नव्या उमेदीने‎ रब्बी हंगामात हरभरा व गहू पिकाची पेरणी केली. पण प्रकल्प‎ विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे लोणी उपकालव्याची दुरुस्ती न‎ केल्याने गणगाव शेत शिवारातील मायनरच्या शेवटच्या‎ टोकापर्यंत पाणीच न पोहोचल्याने या शेतकऱ्यांना अडचणींचा‎ सामना करावा लागत आहे.

कोरडवाहू शेती ओलिताखाली‎ आणण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी देवगाव सिंचन प्रकल्प उभारण्यात‎ आला. या प्रकल्पाची सिंचन क्षमता १ हजार ८१६ हेक्टर क्षेत्र‎ इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात १ हजार ३३४ हेक्टर क्षेत्रात सिंचन‎ होत आहे. मुख्य कालवा आणि उप वितरिका जीर्ण झाल्याने‎ सिंचन क्षमता कमी झाली आहे. लोणी कालव्याची दुरुस्ती न‎ केल्यामुळे झाडे झुडपे वाढली आहे. त्यामुळे मायनरच्या‎ शेवटच्या टोकापर्यंत पाणीच पोहचत नसल्याने १५‎ दिवसाआधी पेरणी केलेल्या त्या पिकाला पाहिले ही पाणी न‎ पोहचल्यामुळे, वन्य प्राण्यांकडून पेरलेल्या हरभरा पिकाची‎ जमीन उकरून नासाडी केली जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...