आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील कोटंबा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे दि. २४ ते ३१ मार्च पर्यंत श्रीमद् भागवत कथा तसेच ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सकाळी सहा वाजता पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हरिनाम सागर भागवत कथा तसेच हरिपाठ नियमित चालत असे. या कार्यक्रमाची सांगता शनिवार, दि. १ एप्रिल ला संत रामगिरी महाराजांच्या पालखी द्वारे झाली. सकाळी निघालेली ही संत रामगिरी महाराजांची दिंडी दुपारी साडेतीन वाजता विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे पोहोचली.
संपूर्ण गावकरी लोक हातात केरसुणी घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करीत घरासमोर सुंदर रांगोळी चे रेखाटन काढून घरांसमोर आंब्याचे पानाचे तोरण बांधून संपूर्ण गाव सजवला होता. ही पालखी संपूर्ण गावातील लोकांच्या अंग नातून जात असताना लोकं त्यांची पूजा करीत असे. अनेक ठिकाणी नाश्ता चहापाणी मठ्ठा शरबत यांचं आयोजनही लोकांकडून करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात गळवा येथील भजनी मंडळ लोणी येथील भजनी मंडळ तसेच अनेक विविध गावातून स्त्री व पुरुष आपापले भजनी मंडळ घेऊन सहभागी झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.