आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:मातृभाषेद्वारे कोणतेही ज्ञान‎ आत्मसात करता येते : कुंटे‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातृभाषेतून कोणत्याही स्वरूपाचे ज्ञान‎ सहज प्राप्त करता येऊ शकते. तसेच‎ मातृभाषा उत्तम प्रकारे अवगत असेल तर‎ इतर भाषा सुद्धा सहजपणे आत्मसात करता‎ येईल, आपल्या मातृभाषेला समृद्ध करायचे‎ असेल तर दैनंदिन व्यवहारात मराठी‎ भाषेचा अधिकाधिक वापर करणे ही‎ प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. असे‎ प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.‎ दुर्गेश कुंटे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन‎ करताना केले.‎ लोकनायक बापूजी अणे महिला‎ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन‎ पंधरवडा निमित्त शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर‎ स्पर्धा तसेच काव्यवाचन स्पर्धा पार पडली.‎

१४ ते २८ जानेवारी हा कालावधी ‘मराठी‎ भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा केला‎ जातो. त्यानिमित्त वरिष्ठ व कनिष्ठ‎ महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे‎ काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी‎ आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे तर‎ डॉ. कविता तातेड आणि प्रा. ज्ञानेश्वर गटकर‎ परीक्षक म्हणून लाभलेले होते. याप्रसंगी‎‎‎‎‎‎‎‎‎ मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या‎ पर्यवेक्षिका प्रा. जान्हवी कुंटे, मराठी विभाग‎ प्रमुख डॉ. ममता दयणे, वाणिज्य विभाग‎ प्रमुख प्रा. योगिता बोरा उपस्थित होत्या.‎

विद्यार्थिनींच्या मराठी भाषाविषयक वाचन व‎ लेखन कौशल्याचा विकास व्हावा, या‎ उद्देशाने प्रस्तुत स्पर्धांचे आयोजन करण्यात‎ आले आहे, असे डॉ. ममता दयणे यांनी‎ प्रास्ताविकात सांगितले. कनिष्ठ‎ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. जान्हवी‎ कुंटे यांनी मराठी भाषेची महती विशद करून‎ विद्यार्थिनींना मराठी भाषा संवर्धन पंधरवडा‎ निमित्त शुभेच्छा दिल्या. काव्यवाचन स्पर्धेला‎ परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.‎ कविता तातेड यांनी विद्यार्थिनींना‎ काव्यवाचन स्पर्धेच्या संदर्भात मार्गदर्शन‎ करताना''आधुनिक काळातील आईचे‎ चित्रण विद्यार्थिनींनी आपल्या लेखणीतून‎‎‎‎‎‎‎‎‎ शब्दबद्ध करावे'' असे विचार मांडले.

प्रा.‎ ज्ञानेश्वर गटकर यांनी विद्यार्थिनींना‎ काव्यवाचन करताना कवितेचा आशय,‎ सादरीकरण,आणि वाचिक अभिनय या‎ घटकांच्या संदर्भात मार्गदर्शन केले. मराठी‎ भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित‎ ''आई या विषयावरील काव्यवाचन स्पर्धेत‎ ४९ विद्यार्थिनींनी स्वरचित तसेच प्रतिभावंत‎ कवींच्या कविता सादर केल्या.‎ विद्यार्थिनींच्या श्रवण आणि लेखन‎ कौशल्याला वाव मिळावा याकरिता‎ शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात‎ आली. या स्पर्धेत ७३ विद्यार्थिनींनी सहभाग‎ घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनोद‎ चव्हाण तर आभार डॉ. सुचिता ढेरे यांनी‎ केले. प्रा. कमलेश देशपांडे, प्रा.नारायण‎ वाघमारे, प्रा. सतीश देशपांडे, प्रा. वैशाली‎ वाटकर, प्रीती तिवाडे यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...