आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी शासनाने सलोखा योजना सुरु केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात ''१३ एप्रिल'' हा ''सलोखा योजना दिवस'' म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्याना सदर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे.
शेतजमीनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आपापसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी शासनाने ही योजना लागु केली आहे. ही योजना दोन वर्षासाठी लागू राहील. एकमेकांच्या नावावर शेत जमिनीचा ताबा असणा-या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी नाममात्र मुद्रांक शुल्क एक हजार रुपये आकारण्याबाबत सवलत सलोखा योजनेत देण्यात आली आहे. शासन निर्णयामध्ये राज्यातील प्रत्येक गावांमध्ये अंदाजे ३ प्रकरणे असण्याबाबत नमुद करण्यात आलेले आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये २१५९ महसुली गावांमध्ये अंदाजे ६४७७ एवढी प्रकरणे असण्याची शक्यता आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.