आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामारेगाव तालुक्यातील पहिलेच शेतकरी ओला दुष्काळामुळे हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याचां माल निघण्याला सुरुवात झाली असून कापूस, सोयाबीन इत्यादी माल मोठ्या प्रमाणत निघत आहे असून घुरट्या चोरांची सुरवात झाली आहे. दोन दिवसापूर्वी कोलगाव येथील सुनील पारखी यांच्या शेतातील सोयाबीन चोरीला गेले आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या माल चोरीला जाणार आहे. म्हणून छावा क्षात्रवीर सेनेच्या शिष्टमंडळाने मारेगाव ठाणेदार राजेश पुरी यांची भेट घेऊन चर्चा केली. चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनातून प्रदेश अध्यक्ष अनिल पारखी यांनी केली आहे.
यापुढे कोणात्याही शेतकऱ्यांच्या शेतातील माल चोरीला गेला तर छावा क्षात्रवीर सेना आंदोलन करेल याची दखल पोलिस प्रशासनाने घ्यावी, असा इशारा देण्यात आला. छावा क्षात्रवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष अनिल पारखी, महीला प्रदेश अध्यक्ष संगीता डाहुले, विशाखा राजूरकर, महिला विदर्भ अध्यक्ष प्रतिभा तातेड, विदर्भ अध्यक्ष विलास बूरान, विदर्भ संपर्क प्रमुख विनोद आवारी, जिल्हा अध्यक्ष राजू जुनगरी, तालुका अध्यक्ष अनंता घोटेकर, राजू धाबेकर, अभिषेक उपरे, पृथ्वीराज घोटेकर, सुहास वासाडे, प्रणय पारखी, सारंग खुसपूरे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.