आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रधानमंत्री किसान सन्माननिधी’ योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सन्मान निधी वितरीत केल्या जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आवश्यक आहे.यासाठी पोस्ट विभागाने पोस्टमनच्या माध्यमातून गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्ट विभागाच्या वतीने केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यात २ हजार रुपये प्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये मानधन देण्यात येते. या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
सोपी आणि सुलभ प्रक्रिया याकरीता इंडिया पोस्ट पेमेंट बँक कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून गावातील पोस्टमास्तर लाभार्थ्यांना संपर्क करून इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाती उघडून देतील.आधार कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी आणि सुलभ आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.