आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी संजीवनी मिळावी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी हे सातत्याने प्रयत्नशील असतात, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई सोमा पोपेरे यांनी केले. त्या शनिवार, दि.५ मार्च रोजी डोंगरखंडाळा येथील सहकार विद्या मंदिर प्रांगणात शेतकऱ्यांना आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेशाम चांडक, हवामान तज्ञ पंजाबराव डख हे उपस्थित होते. शेतकरी मागील काही वर्षापासून शेतकरी सातत्याने येणाऱ्या संकटामुळे हताश झाला आहे. शेतीतले उत्पन्न कमी होत चालले आहे.
रासायनिक खताच्या किंमती वाढत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यातूनच शेतकरी निराशाग्रस्त होऊन आत्महत्येकडे वळत आहे. जिल्ह्यातील आत्महत्या थांबाव्या यासाठी राधेश्याम चांडक हे सातत्याने प्रयत्नशील असतात. अहमदनगर येथील राहीबाई पोपेरे यांनी कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल शासनाच्या वतीने त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भाईजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राहीबाईचे मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्नशील होते. जिल्ह्यात हवामानावर आधारित शेती करण्याचे तंत्र व पारंपारिक बियाण्यांच्या वाणाच्या संरक्षक संवर्धक विषयावर मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन डोंगरखंडाळा येथे केले. कार्यक्रमात राहीबाईंनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत पारंपारिक शेती तंत्रज्ञान बियाण्याचे वाण आदी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आधुनिक शेतीमध्ये रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे. परिणामी शेतीचा पोत घसरत चालला आहे. त्याचा मानवी जीवनावर देखील दुष्परिणाम होत असल्याचे अनेक संदर्भ राहीबाई यांनी दिले. तर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी हवामानावर आधारित शेती करावे असे सुचविले. प्रास्ताविक राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी केले. संचालन व मार्गदर्शन करताना राहीबाई सोमा पोपेरे .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.