आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडीत काम करताना महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त गटविकास अधिकाऱ्यांनी मंगळवार, दि. ११ एप्रिल रोजी पासून मनरेगाचा कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन दिले.यात प्रामुख्याने मजुरांच्या उपस्थितीबाबत गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरू नये, ह्याकरीता शासन निर्णय निर्गमित करणे, ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणांची जबाबदारी निश्चित करणे, राज्यस्तरावरून मंजूर करण्यात येत असलेल्या कामांसाठी गटविकास अधिकाऱ्यांना ६०:४० चढे प्रमाण राखण्याची जबाबदारी दिली आहे.
ही जबाबदारी काढून घेण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या अनुषंगाने पार पडलेल्या बैठका, चर्चेदरम्यान सर्वच मुद्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कुठल्याही आश्वासनांची पूर्तता अद्याप पर्यंत करण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने मंगळवार, दि. ११ एप्रिल रोजी पासून मनरेगाच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कामावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. निवेदन देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जे. एन. आभाळे, के. एल. गड्डापोड, आर. पी. पवार, जयश्री वाघमारे, सुभाष मानकर, के. पी. पवार, डी. एच. टाकरस, संजय राठोड, किशोर गोळे, एस. बी. मानकर, किशोर गज्जलवार आदी अधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.