आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:3332 कोटींचा व्यवसाय अन् 1931 कोटींच्या‎ ठेवी ही विश्वासाची पावती : राजश्री पाटील‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२२-२३ या आर्थिक वर्षात गोदावरी‎ अर्बनद्वारे ३ हजार ३३२ कोटींचा‎ व्यवसाय व विक्रमी १ हजार ९३१‎ कोटींच्या ठेवी ही ग्राहकांच्या‎ विश्वासाची पावती आहे. यासोबतच‎ कर्मचाऱ्यांची सचोटी व कार्य‎ तत्परतेमुळे प्रगतीचा आलेख असाच‎ उंचावत राहील, असा विश्वास‎ गोदावरी अर्बनचे अध्यक्ष राजश्री‎ पाटील यांनी व्यक्त केला.‎ वार्षीक अर्थीक पत्रक अहवाल‎ सादरीकरण कार्यक्रमात त्या बोलत‎ होत्या.

व्यवस्थापकीय संचालक‎ धनंजय तांबेकर, संस्थेचे सचिव अॅड.‎ रवींद्र रगटे, संचालक प्रा. सुरेश‎ कटकमवार, वर्षा देशमुख, प्रसाद‎‎‎‎‎‎‎‎‎ पाटील लेखा परिक्षक जीवन‎ लाभशेटवार, मुख्य व्यवस्थापक‎ सुरेखा दवे-सावंत, अधीक्षक विजय‎ शिरमेवार यांच्यासह कर्मचारी‎ उपस्थित होते.‎ १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या‎ आर्थीक वर्षात संस्थेने १ हजार ९३१‎ कोटीं ठेवींचा पल्ला गाठला असून,‎ यातून १ हजार ४०२ कोटींचे कर्ज‎ वितरण केले आहे.

या वर्षभरात‎‎‎‎‎‎‎‎‎ संस्थेने एकूण ३ हजार ३३२ कोटींचा‎ व्यवसाय केला आहे.पुढील आर्थिक‎ वर्षाच्या सर्व वैधानिक तरतुदी करून‎ संस्थेला २४ कोटींचा शुद्ध नफा झाला‎ आहे. संस्थापक खासदार हेमंत पाटील‎ यांनी भ्रमणध्वनी द्वारे संस्थेच्या अध्यक्ष‎ राजश्री पाटील, समस्त संचालक‎ मंडळ, व्यवस्थापकीय संचालक‎ धनंजय तांबेकर यांच्यासह‎ कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.‎