आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी‎ बांधवांनी काळजी घेणे गरजेचे‎:येत्या तीन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता‎

यवतमाळ‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय हवामान खात्याने‎ वर्तवलेल्या पाच दिवसीय हवामान‎ अंदाजानुसार जिल्ह्यात येत्या तीन‎ दिवसांत हवामानामध्ये अवकाळी‎ पाऊस, सुसाट वाऱ्यासह पावसाची‎ शक्यता वर्तवली आहे. येत्या दि. १४‎ ते १७ मार्च या दरम्यान मेघगर्जना‎ सह विजांचा कडकडाट अवकाळी‎ पावसाची शक्यता आहे. तर १८ मार्च‎ रोजी वादळी वाऱ्याचा अंदाज‎ वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे‎ किमान व कमाल तापमानात बदल‎ होणे अपेक्षित आहे. यादरम्यान‎ आपल्या आरोग्यासोबतच पिकाच्या‎ आरोग्याची देखील शेतकरी‎ बांधवांनी काळजी घेणे गरजेचे‎ आहे.‎हरभरा परिपक्वतेच्या काळात‎ घाटे आणि पाने पिवळी पडत‎ असताना ओलीत बंद ठेवावे.‎

परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची‎ त्वरित कापणी करावी, पुढील‎ दिवसांमध्ये येणाऱ्या अवकाळी‎ पावसा आधी कापणीस उशीर‎ झाल्यास घाटे तुटून पडल्याने‎ उत्पादनात घट होऊ शकते. गहु‎ पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत‎ उंदीर व्यवस्थापन करण्यासाठी‎ उंदराचे शेतातील पर्यायी अन्न स्त्रोत‎ नष्ट करावेत तसेच शेतातील बिळे‎ बंद करावीत. यासोबतच भाजीपाला‎ व फळबागांना नियमितपणे ओलीत‎ करावे व ओलितासाठी सुक्ष्म सिंचन‎ पद्धतीचा अवलंब करावा,‎ जेणेकरून मेघगर्जनेसह वादळ वारे‎ व पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यास‎ मदत होईल.

पाण्याचा अपव्यय‎ टाळता येईल. कोंबड्यांच्या‎ शेडमध्ये पक्षांची गर्दी टाळावी,‎ शेडच्या आकारमानानुसार‎ आवश्यक तेवढ्याच कोंबड्या‎ ठेवाव्यात. तसेच अवकाळी‎ पावसामुळे जनावरांना सुरक्षित‎ ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करून‎ ठेवावी. शेतात तयार झालेला‎ मालावर ताड पट्टी टाकून त्याला‎ सुरक्षित करावे. पालेभाज्या फळे हे‎ सुद्धा खराब होऊ नये म्हणून त्याची‎ देखील ठेवण्याची व्यवस्था करणे‎ आवश्यक आहे.‎

बातम्या आणखी आहेत...