आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानोरा तालुक्यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी केली आहे. मात्र बदललेल्या वातावरणामुळे बहरलेल्या सोयाबीन आणि तुरीच्या पिकावर संकटांचे ढग जमा होताहेत. परिणामी तुरीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने, पुन्हा नव्या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यातील बहुतांश शेतकरी हमखास येणारे पीक म्हणून मागील काही वर्षांपासून सोयाबीन आणि तुरीकडे वळलेले आहे. सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर राहिलेल्या तुरीचे पीक सिंचनाची सुविधा व यावर्षी पोषक वातावरण असल्यामुळे बऱ्यापैकी आलेले आहे.
अनेक ठिकाणी तुरीच्या शेंगा लागल्या असून काही ठिकाणी तूर ही फुलावर आहे. यावर्षी आधीच अतिवृष्टी झाल्याने तुर पिकावर त्याचा मोठा परिणाम होऊन तूर पीक बाल्यावस्थेतच मोठ्या प्रमाणात जळून गेली होती. अतिवृष्टीतून बचावलेली तूर आता फलधारणा करीत असून मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून, त्याचा परिणाम फुलोऱ्यावर आलेल्या तूर पिकावर झाला असून, फुलगळ आणि किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरलेली आहे. निसर्गाचे हे दुष्टचक्र निवळण्याची प्रार्थना शेतकरी करताहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.