आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी‎:अचानक आलेल्या पावसाने शहरवासीयांची उडाली तारांबळ, पिकांचे नुकसान‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात‎ उष्णतेत वाढ होत असतानाच शुक्रवार दि.‎ ७ एप्रिल रोजी सायंकाळी अचानक ‎ ‎ अवकाळी पावसाने हजेरी लावली.‎ अवघ्या काही वेळात जोरदार बरसलेल्या‎ या पावसाने रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहु ‎ ‎ लागले. सायंकाळी शहरात नागरिक ‎ ‎ कामामध्ये असताना अचानक आलेल्या‎ या पावसाने सर्वांची तारांबळ उडवून दिली‎ .‎ यंदा उन्हाळ्याची सुरूवात होताच‎ फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा‎ भडकला होता. मात्र मार्च महिन्यामध्ये‎ बरेच दिवस ढगाळ वातावरण आणि ‎ ‎ अवकाळी पाऊस यामुळे तापमान मर्यादीत ‎ ‎ राहीले.

मात्र त्या काळात आलेल्या‎ अवकाळी पावसाने आणि काही ठिकाणी ‎ ‎ झालेल्या गारपिटीने सुमारे ४ हजार ‎ ‎ हेक्टरवरील शेतीपीकांचे नुकसान झाले. ‎ ‎ त्यानंतर एप्रिल महिन्याची सुरूवात होताच ‎ ‎ तापमान वाढु लागले होते. हे तापमान ४० ‎ ‎ अंशांपर्यंत पोहचत नाही तोच पुन्हा‎ अवकाळी पावसाचा इशारा हवामान‎ खात्याने दर्शविला होता. त्यात गुरूवार दि.‎ ६ एप्रिल रोजी जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ ‎ ‎ वातावरण कायम होते. शुक्रवारी‎ सायंकाळी अचानक सोसाट्याच्या‎ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी‎ लावली.‎

नेर तालुक्यात गारपिटीने‎ नुकसान‎ शुक्रवारी दुपारी नेर तालुक्यात जोरदार‎ पावसाने अचानक हजेरी लावली.‎ यावेळी पावसासोबत सोसाट्याचा वारा‎ आणि गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्याचे‎ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.‎ प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यात‎ साधारणतः ४०० ते ५०० हेक्टरवरील गहू,‎ भाजीपाला, फळबाग, अंबा, संत्रा याचे‎ नुकसान झाले आहे. आज शासकीय‎ सुटी असल्याने नुकसानीचा अचूक‎ अंदाज मिळाला नसला तरी गव्हाचे‎ मोठया प्रमाणात नुकसान झाले.‎

दोन बैलांसह एका गायीचा‎ वीज पडुन मृत्यू‎ महागाव तालुक्यातील थार (बु) येथील‎ युवा शेतकरी रेणुकादास शिंदे यांचे‎ संगम शिवारात शेत आहे. ते आपले‎ बैल घेवुन शेत काम करीत असतानाच‎ दुपारी १.३० वाजता पाऊस सुरू झाला.‎ त्यामुळे शिंदे यांनी काम थांबवुन बैल‎ झाडाखाली बांधले. दरम्यान अचानक‎ वीज कोसळून दोन्ही बैल जागीच ठार‎ झाले. . याचप्रमाणे महागाव‎ तालुक्यातील पेढी या गावी दिगंबर भराटे‎ यांची एक गाय दुपारी अचानक वीज‎ पडल्याने ठार झाली.‎