आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याची शेतमालाची परिस्थिती बघता कापसाला गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच कमी भाव आहे. अशीच परिस्थिती इतरही शेतमालाची आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला घेऊन घाटंजी येथे एक दिवसीय शेतकरी ठिय्या आंदोलन दि. ७ फेब्रुवारीला आयोजित केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व महेश पवार सामाजिक कार्यकर्ते आणि रितेश बोबडे युवा कार्यकर्ते हे करणार असून या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात येणार आहे. या आंदोलनाला सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय घाटंजीच्या पुढे सुरू होईल.
यामध्ये विविध शेतकरी नेते आपली भूमिका मांडणार आहे. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या, कापूस तूर सोयाबीनला योग्य भाव द्यावा, कापूस सोयाबीन निर्यात खुली करावी, कापूस व इतर शेतमालाच्या आयातीवर निर्बंध ठेवावा, कृषी पंपाला दिवसा वीज देण्यात यावी, जंगली जनावरापासून शेतीला संरक्षण मिळावे, उर्वरित पीक विमा वाटप करण्यात यावा तसेच सरसकट देण्यात यावा, तांत्रिक बाबीमुळे राहिलेल्यांना कर्जमाफी देण्यात यावी, पी एम किसान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळावा, इत्यादी मागण्या या आंदोलनात असणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भूमिपुत्र संघर्ष समितीतर्फे महेश पवार, रितेश बोबडे यांनी केलेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.