आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिवसा तालुक्यातील निम्मवर्धा प्रकल्पातील धारवाडा, कौंडण्यपूर व छिदवाडी येथील भूसंपादित शेतकऱ्यांना मोबदल्याचा धनादेश वाटप न केल्यामुळे या गावांमधील शेतकऱ्यांनी मंगळवारपासून (दि. ११) धारवाडा बस स्टॉप येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. निम्म वर्धा धरणाच्या पाण्यात बुडालेल्या जमिनीचा अद्यापही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यासाठी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून ही शेतकऱ्यांच्या पदरी काहीच न पडल्याने संतप्त झालेले शेतकरी प्रकाश थोटे, मनोहर इंदोरे, सुधाकर रताळे, साहेबराव राठोड, संदीप काळे, वामन भगत, बाबुराव केवदे, श्याम इंदोरे, गुणवंत म्हात्रे, महेंद्र पखाले, कवडू बनसोड, नामदेव तांबे, भिमराव भिल आदींनी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला द्यावा, अशी मागणी करत बेमुदत उपोषण पुकारले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.