आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या आठवडाभरापासून कोराेनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात रविवार, ९ एप्रिल रोजी ४२९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात नव्याने ५ जण काेराेना बाधित आढळून आले. पूर्वीचे १६ आणि नवे ५, असे मिळून २१ अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर कोराेनाने पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट दिसत आहे. मागील आठवड्यात एकाच दिवशी तब्बल १० बाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अशात सर्दी, खोकला, ताप आदी रुग्णांच्या नियमित कोराेना चाचण्या केल्या जात आहेत.
रविवार, ९ एप्रिल रोजी ४२९ जणांची कोराेना चाचणी केली. यात ४२४ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या असून, पाच जण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आर्णी, यवतमाळ व इतर शहरातील प्रत्येकी एक आणि दिग्रस तालुक्यातील दोन, असे मिळून पाच रुग्णांचा समावेश आहे. सध्या दोन रुग्ण होमआयसोलेट आहेत. तर १७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, उर्वरित दोघे परजिल्ह्यात उपचार घेत आहेत. कोराेनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तरीसुद्धा उपाययोजनांच्या अनुषंगाने शासन स्तरावरून कुठल्याही प्रकारचे निर्देश प्राप्त झाले नाही. परंतु सातत्याने वाढत असलेल्या रुग्णांमुळे येत्या काही दिवसांत निर्देश प्राप्त होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.