आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ‎ वातावरण:यंदा प्रथमच जिल्ह्याचे‎ तापमान 41 अंशांवर‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात ढगाळ‎ वातावरणामुळे घसरलेले तापमान दोन‎ दिवसांपासून पुन्हा वाढले आहे.‎ बुधवारी यंदाच्या मोसमातील‎ सर्वाधिक ४१ अंश तापमानाची नोंद‎ कृषी संशोधन कार्यालयाने केली.‎ लवकर तापमान ४३ अंशांपर्यंत जाईल‎ असा अंदाज आहे.‎ मार्च महिन्यात तब्बल चारवेळा‎ अवकाळी पावसाचा तडाखा‎ बसल्याने जिल्ह्याला यंदा उशिराने‎ तापमानवाढीला सामोरे जावे‎ लागले. एप्रिलच्या पहिल्या‎ आठवड्यात देखील ढगाळ‎ वातावरण तयार झाल्याने ३८‎ अंशांपर्यंत गेलेले तापमान ३५‎ अंशांपर्यंत खाली घसरले होते.‎ मात्र, हे तापमान निवळताच‎ केवळ दोन दिवसांत पाऱ्याने‎ उसळली घेतली.‎ बुधवारी तर यंदाच्या उन्हाळी‎ मोसमातील सर्वाधिक ४१ अंश‎ तापमान नोंदवले गेले. यामुळे‎ यवतमाळकरांच्या अंगाची लाही‎ लाही करणारा ठरला. किमान‎ तापमानदेखील २४ अंशावर गेल्याने‎ उकाड्यात भर पडली. दरम्यान,‎ कमाल तापमानाचा पारा वाढून‎ लवकरच ४३ अंशांपर्यंत तापमान‎ वाढण्याची भिती आहे. यामुळे‎ जनजीवनावर परिणाम होऊन‎ उष्माघाताचा धोका वाढू शकतो.‎

शीतपेयांची वाढली‎ मागणी‎ गत काही दिवसांपासून उन्हाचा‎ पारा चढताच उकाड्याने जीवाची‎ तगमग होत आहे. वाढत्या‎ उष्णतेमुळे जिव्हाला थंडावा‎ देणाऱ्या शीतपेयाची आता मागणी‎ वाढू लागली आहे. निंबू शरबत,‎ रसवंती, आईस्क्रीम पार्लरमध्ये‎ प्रचंड गर्दी होत आहे. तर मार्केट‎ मध्ये विक्रीसाठी आलेल्या टोप्या,‎ मातीचे माठ, स्कार्फ उन्हाळ्याची‎ चाहूल देत आहेत.‎

गेल्या वर्षीची स्थिती‎ गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी रोजी‎ तापमान ४० अंश एवढे नोंदवले गेले‎ होते. यानंतर वातावरणातील‎ बदलाने तापमान घसरले होते. मात्र,‎ १४ मार्च २०२२ रोजी ते ३९.७ आणि‎ त्यानंतर तिसऱ्याच दिवशी १६‎ मार्चला तापमान तब्बल ४२.९ अंश‎ एवढे नोंदवले गेले होते.‎