आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तात्काळ उपचार होण्यासाठी उचलले पाऊल‎:जिल्ह्यातील 66 प्राथमिक‎ आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे.‎ त्यामुळे आरोग्यावर परिणाम पडण्याची शक्यता‎ आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ६६‎ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार ‎ ‎ करण्यात आले आहे. दरम्यान, वातावरणातील ‎ ‎ बदलाबाबत जागृती निर्माण करणे, आरोग्य संस्था ‎ ‎ वातावरणातील बदलासाठी अधिक सक्षम करणे, ‎ ‎ त्यासाठी आवश्यक ती तयारी आणि मनुष्यबळ ‎ ‎ प्रशिक्षित करण्यात येत आहे.‎ वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी ‎ ‎ आरोग्यावर तसेच विविध आजारांच्या प्रमाणावर‎ होत आहे. या विषयाचे महत्व लक्षात घेऊनच ‎ ‎ २०२०-२१ पासून राष्ट्रीय वातावरणातील बदल‎ आणि मानवी आरोग्य कार्यक्रम आरोग्य ‎ ‎ अभियानांमध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. ‎ ‎

वातावरणातील बदलाला संवेदनशील असणाऱ्या ‎ ‎ आजारांना समर्थपणे तोंड देता यावे, यासाठी सर्व‎ नागरिक आणि विशेषतः लहान मुले, स्त्रिया,‎ वृध्द, आदिवासी आणि परिघावरील‎ जनसमूहासाठी आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण‎ करण्यात येत आहे.‎ उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण होत‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ आहे. अशा परिस्थितीत तात्काळ उपचार होणे‎ गरजेचे आहे. या साठी जिल्ह्यातील ६६ प्राथमिक‎ आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार करण्यात‎ आले आहेत. चक्कर येणे सुस्त वाटणे, त्वचा‎ लालसर होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाचे‎ ठोके वाढणे आदी उष्माघाताचे लक्षणे आहे.‎ कार्यशाळेत उपस्थित आरोग्य अधिकारी व अन्य मान्यवर.‎

कार्यशाळेत आरोग्य‎ अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन‎ आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय‎ अधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हा नियोजन‎ सभागृहात पार पडली.या कार्यशाळेत‎ वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय‎ महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक‎ डॉ.सचिन दिवेकर,डॉ.&nbs p;विजय डोंपले‎ यांनी पॉवर पॉइंटद्वारे सादरीकरण केले.तर‎ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस‎ .चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ‎ आर.डी.रा ठोड यांनी मार्गदर्शन केले.या‎ कार्यशाळेला मधुकर मडावी,डॉ. ;शाहु,डॉ.‎ ;स्मिता पेटकर,डॉ. ;निलेश लीचडे,तालुका‎ आरोग्य अधिकारी,वैद्यक ीय अधिकारी‎ मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎