आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:सात दिवसांत दुर्गंधी बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा‎

कळंब‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब शहराला लागून असलेल्या यवतमाळ मार्गावरील ‎ ‎ छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाजवळ अनेक ‎ ‎ महिन्यापासून दुर्गंधी पसरली असून या संदर्भात‎ नागरिकांनी यापूर्वीच्या नगरपंचायत मुख्याधिकारी,‎ आरोग्य विभागाचे अभियंता यांना निवेदन देऊन सुध्दा ‎ ‎ काहीच फरक पडला नसल्याने दि. २८ फेब्रुवारीला ‎ ‎ नगरपंचायतच्या सत्तेतील नगरसेवकांसह विरोधी‎ गटाच्या नगरसेवकांना निवेदन द्यावे लागत असल्याने ‎ ‎ आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.‎ शहरातील नागरिकांनी नगरपंचायत मुख्याधिकारी‎ अनुप अग्रवाल यांना निवेदन देणे रास्त आहे. पण‎ सत्तेतील नगरसेवक पदाधिकारी व विरोधी गटाच्या‎ नगरसेवकांचा गळ्यात गळा घालण्याचा प्रकार सुरु‎ झाला आहे. तर सात दिवसात दुर्गंधी बंद न झाल्यास‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ आंदोलनाचा इशारा दिला आहे.‎

येथील माथा वस्तीला लागून छत्रपती शिवाजी‎ महाराज उड्डाण पुल असून माथा वस्तीमधील दारुच्या‎ सडव्याचे घाण पाणी पुलाजवळ खड्ड्यामध्ये साचून‎ दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी नागरिकांना उभे‎ राहणेही कठीण होत आहे.‎ नगरपंचायत प्रशासनाने येथे साचत असलेल्या दूषीत‎ पाण्याची विल्हेवाट लावावी, यासाठी विरोधी गटाच्या‎ नगरसेवकांनी निवेदन देणे ठिक असले तरी‎ सत्ताधाऱ्यांनी त्यावर सह्या मारुन निवेदन दिले. हा‎ शहरवासीयांसाठी चिंतनाचा विषय आहे.

सदर निवेदन‎ पहाता शहरवासीयांनी न्याय मागायचा कुणाला अशी‎ शहरात चर्चा सुरु आहे. यावेळी नगरसेविका सुनिता‎ प्रविण निमकर, पंचशिला भेले, नगरसेविका डी. डी.‎ तुमकड, नगरसेवक खुशाल बोकडे, रुपेश राऊत, सागर‎ समुद्रे, आशिष धोबे, अ. अजिज अ. सत्तार, प्रवीण‎ निमकर, सुरज एकनार, आकाश भिसे, मारोती भोयर,‎ संजय पवार, करण मोरे, पीयूष शिंदे, राजु बुल्ले, रफीक‎ खान, शहजाद शेख करीम यांच्यासह शेकडो‎ नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन नगरपंचायत‎ मुख्याधिकारी यांना देण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...