आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:केळापूर तालुक्यात अनेक‎ गरजू घरकुलापासून वंचित‎ ; पहापळच्या दिव्यांग नागरिकाचा उपोषणाचा इशारा‎

पांढरकवडा‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक‎ कल्याणकारी योजनांचा देशातल्या‎ गरजूंना फायदा व्हावा हा मानस ठेवून‎ शासन व अभ्यासक तयार करतात.‎ परंतु ग्रामीण भागात काही वेगळेच‎ वास्तव पाहायला मिळत आहे. २०२४‎ पर्यंत १०० टक्के लाभार्थी यांना‎ घरकुल देऊन घर बांधून देण्याचा‎ प्रयत्न केंद्र व राज्य शासनाचा‎ असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.‎ परंतु ग्रामीण भागात विधवा, दिव्यांग,‎ आत्महत्याग्रस्त कुटुंब, शेतमजूर,‎ कामगार यांना मात्र दुर्लक्षित केले‎ जात आहे.‎ सध्या अधिकारी व पदाधिकारी‎ यांच्या मनमर्जीने योजना चालत‎ असून, यावर शासनासह प्रशासनाचा‎ अंकुश उरला नाही, अशी‎ सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे.‎

अनेक गावांत एकाच घरी मुलगा व‎ वडील यांना एकाच वेळेस घरकुल,‎ अगोदर आले असेल तरी पुन्हा नवीन‎ यादीत नाव, तसेच काही गावात‎ प्रसाद घेऊन घरकुल वाटप व‎ घरकुलाचे हप्ते टाकले जात आहे,‎ अशी चर्चा ग्रामीण भागात आहे.‎ तालुक्यातील अनेक गावातील अशा‎ प्रकारच्या तक्रारी व निवेदने‎ गटविकास अधिकारी यांच्याकडे‎ अनेक ग्रामस्थांनी दिले आहे.‎ करंजीतही गरीब ओबीसी बांधवांच्या‎ घरकुलाचे काम कधी होणार व‎ अधिकारी यांच्या उडवाउडवीचे‎ उत्तर कधीपर्यंत पुरणार, असे अनेक‎ प्रश्न जनसामान्यांसमोर आहेत.‎ पहापळ येथील पुरुषोत्तम ठाकरे हे‎ ५७ टक्के दिव्यांग असून, घराच्या‎ भिंती पडलेल्या अवस्थेत आहे.‎

आपले कुटुंब निराधारच्या मदतीने‎ पोसत असताना जीव मुठीत धरून‎ लहान लेकरासह रोजमजुरी करून‎ पोटाची खळगी भरत आहे. अशातच‎ घराचे बांधकाम करणे शक्य नसून‎ कधी घराच्या भिंती अंगावर पडून‎ जीव जाईल याचा नेम नाही. आमचा‎ असा जीव जाण्यापेक्षा आमच्या‎ हक्क व न्यायासाठी बेमुदत उपोषण‎ करण्याचा इशारा या वंचित दिव्यांग‎ नागरिकाने दिला आहे. तालुक्यातील‎ संपूर्ण खरे लाभार्थी, गरजू,‎ आत्महत्याग्रस्त कुटुंब, निराधार,‎ विधवा, अनाथ यांचे नियोजन करून‎ पंचायत समिती व जिल्हा स्तरावरून‎ योग्य ते नियोजन व्हावे व ग्रामीण‎ विकासाला चालना मिळावी अशी‎ अपेक्षा व्यक्त होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...