आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाकळी - उमरखेड आंदोलन प्रकरणात जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षासह नागरिकांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारीला जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक देवून निवेदन देण्यात आले. उमरखेड तालुक्यातील टाकळी गावाला गेल्या कित्येक वर्षांपासून जायला रस्ता नाही, गावातील नागरिकांनी अनेक आंदोलन केले.
परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. दि. २३ जानेवारीला उपोषण करणार ही प्रशासनाला कल्पना होती. मात्र तरी सुध्दा प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे टाकळीवासीयांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. परंतु राजकीय सूड बुद्धीने जिजाऊ ब्रिग्रेड अध्यक्षा सरोज देशमुख व टाकळीवासीयांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, ते मागे घेण्यात यावे, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांसह अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वैशाली पिसाळकर, शीतल भोयर, उषा दिवटे, मनीषा काटे (भोसले), प्रतिभा मुळे, स्नेहल रेचे, शीतल तेलंगे, अबोली देशमुख, रेखा फलटनकर, शीतल कुरटकर आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.