आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:अल्पवयीन मुलांच्या हाती पेन, पुस्तक‎ नव्हे, तर कोयते, चाकू अन् देशी कट्टेही‎

मयूर वानखडे । यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेन, पुस्तक, खेळण्याचे साहित्य घेवून फिरण्याच्या‎ वयातच मुलांच्या हातात तलवारी, कोयते, चाकू, देशी‎ कट्टे अशी जीवघेणी हत्यारे दिसत आहेत. खून, खुनाचा‎ प्रयत्न, चोरी, विनयभंग, लैंगिक अत्याचार, जबरी चोरी,‎ अशा अनेक गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग‎ वाढला आहे. आताच पोलिसांसह पालकांनी मुलांचे‎ प्रबोधन न केल्यास दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर‎ जाण्याची शक्यता आहे.‎ नववर्षाच्या सुरवातीलाच कळंब शहरातील अश्वीन‎ उर्फ अब्दुल राऊत या तरुणाची चार अल्पवयीन मुलांनी‎ मिळून निर्घृण हत्या केली होती. या घटनेने जिल्ह्यात‎ खळबळ उडाली होती. तर दुसऱ्या घटनेत जबरीने‎ मोबाईल हिसकावणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीच्या‎ मुसक्या शहरातील अवधुतवाडी पोलिसांनी आवळल्या‎ होत्या.

या टोळीकडून तब्बल ६० हून अधीक मोबाईल‎ हस्तगत केले होते. त्याचबरोबर मारेगाव शहरात शेळ्या‎ चोरी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या‎ चोरट्यांमध्ये देखील एका अल्पवयीन मुलाचा सहभाग‎ असल्याचे समोर आले आहे. शहरात संघटीत गुन्हेगारी‎ क्षेत्रात सक्रिय असलेल्या टोळ्यांमध्ये आपापसात होणारा‎ रक्तरंजित संघर्ष ही बाब यवतमाळ शहरवासीयांसाठी‎ नवीन नाही. मात्र, गेल्या काही वर्षातील बऱ्याच खुनांच्या‎ घटना क्षुल्लक वादातून झाल्या आहेत. विशेष म्हणजे‎ ह्यात १५ ते १८ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलांचा‎ सहभाग असून, त्यातून थेट खूनापर्यंतची मजल‎ पोहोचल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत‎ असलेल्या घटनांपासून बोध घेत अल्पवयीन मुलांना‎ गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी पालकांना स्वतः‎ पुढाकार घ्यावा लागणार आहे. परिसरात आपली दहशत‎ असावी यासाठी, ''धिंगाणा'' घालणारी, हातात चाकू,‎ तलवारी आणि रिव्हॉल्व्हर सारखी हत्यारे घेवून फिरणारी‎ अल्पवयीनांची टोळकी, महागडी चैनीच्या वस्तू वाहने,‎ याचे आकर्षण, यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात ओढली जाणारी‎ मुले वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या‎ प्रकरणामुळे पोलिसांसमोर डोकेदुखी मात्र वाढली आहे.‎

गुन्हेगारी वृत्ती रोखण्याचे‎ आव्हान‎ आई-वडीलांच्या दुर्लक्षाने त्यांच्यावर‎ योग्य संस्कार घडल्या जात नाही.‎ वाईट संगत, सवयीमुळे मुले वाम‎ मार्गाला लागत आहे. कळत नकळत‎ असो अथवा किरकोळ कारणावरून‎ भांडणे नित्याचेच झाले आहे. मात्र,‎ त्याचे रूपांतर हिंसक भांडणामध्ये होत‎ आहे. काही वेळा अल्पवयीन मुले‎ मोठ्या मुलांसोबत मैत्री करताना‎ दिसतात. त्यांच्याशी झालेली किरकोळ‎ वादातही ते चाकु, तलवारी सारख्या‎ हत्यारांचा वापर केल्याची अनेक‎ उदाहरणे समोर आहेत. सतत वाढणारी‎ हिंसकता आणि गुन्हेगारी रोखण्याचे‎ मोठे आव्हान पालकांसह‎ पोलिसांसमोर आहे.‎

महागड्या वस्तू, वाहनेही पुरवतात‎ गल्ली बोळात असलेले ''भाई'' मंडळींचे असलेले पोस्टर्स लावून‎ परिसरात दरारा निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांनी वेळोवेळी‎ तडीपारी, मोक्का ह्या माध्यमातून केला आहे. त्याचा फारसा फायदा‎ होताना दिसत नाही. खर्रा, सिगारेट आणून देण्याच्या कामानेच ह्याची‎ सुरूवात होते. भाईगिरीची नशा डोक्यात असलेल्यांना हेरून, त्यांना‎ हव्या त्या महागड्या वस्तू, वाहने सराईत गुन्हेगारांकडून पुरविल्या‎ जात आहे. अल्पवयीन युवकांवर गुन्हा दाखल झाल्यास त्यांची‎ रवानगी सुधारगृहात होते. तद्नंतर सुटका होताच त्या मुलांचा‎ पुन्हा-पुन्हा वापर केला जात आहे.‎

‘धुडगूस'' घालणे प्रतिष्ठेचे‎ गल्लीतील मित्रांमध्ये झालेला वाद,‎ किरकोळ भांडण आदी प्रकारामुळे‎ अल्पवयीन मुलांकडून परिसरात‎ हातात चाकू, तलवारी घेवून दहशत‎ पसरवण्याचे प्रकार वाढले आहे.‎ वाहन, दुकाने, घरे यांची तोडफोड‎ केल्याने त्यांची परिसरात दहशत‎ वाढते. त्यामूळे ''धुडगूस'' करणे हे‎ सध्या वाट चुकलेल्या तरुणांमध्ये‎ प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे.‎ पालकांनी वेळीच लक्ष दिल्यास हे सर्व‎ प्रकार थांबू शकतात. यासाठी दंडुका‎ नव्हे, तर त्यांचे प्रबोधनाची गरज आहे.‎

आई-वडिलांनी मुलांसोबत वेळ घालवावा‎
आजच्या धकाधकीच्या जीवनात आई-वडील मुलांकडे‎लहानपणापासूनच दुर्लक्ष करतात. त्यांच्यासोबत‎संवाद साधत नाही. त्यामूळे लहान मुले व्यसनासह‎वाईट संगतीत जात आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगारी‎क्षेत्रात जावून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचा‎प्रयत्न करीत आहे. त्यामूळे आई-वडीलांनी‎आपल्या मुलांसोबत वेळ घालावा, त्याच्याशी संवाद‎साधावा आणि त्याला खर्चासाठी देण्यात येणाऱ्या‎ पैशाबाबत विचारपूस करावी.‎ डॉ. श्रीकांत मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ, यवतमाळ‎

बातम्या आणखी आहेत...