आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी सोडणाऱ्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू‎:माळ असोली येथील घटना, दोन लाईनमनविरुद्ध गुन्हा दाखल‎

पोफाळी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद तालुक्यातील माळ असोली‎ गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या शरद‎ राठोड या ३२ वर्षीय तरुणाचा दोन‎ लाइनमनच्या हलगर्जीपणामुळे विजेचा‎ शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना‎ दि. १० एप्रिलला सायंकाळी घडली असून‎ या प्रकरणी दोन लाईनमनविरुद्ध पोफाळी‎ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.‎ या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, पुसद‎ तालुक्यातील माळ आसोली ग्रामपंचायत‎ येथे शरद राठोड हा गावात पाणी‎ सोडण्याचे काम करतो. पाणी पुरवठा मोटर‎ चालू करण्यासाठी गेला असता, मोटर पंप‎ चालू झाला नाही. म्हणून शरद हा धनज-‎ मोहदरी फाट्यावर विद्युत पुरवठा दुरुस्त‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्यासाठी लाइनमन नंदापुरे व दुसरे‎ लाइनमन चंद्रवंशी यांची परमिट घेउन‎ विद्युत पुरवठा बंद असताना फ्यूज टाकते‎ वेळी अचानक विद्युत पुरवठा सुरु झाला.‎ अश्यात शरदला जबर विजेचा शॉक‎ लागल्यामुळे तो विद्युत पोलवरून खाली‎ पडुन गंभीर जखमी झाला.

शरदला गंभीर‎ अवस्थेत पुसद येथील रुग्णालयात भरती‎ केले असता, डॉक्टरांनी त्यांना नांदेड येथे‎ रेफर केले.‎ नांदेडकडे तात्काळ नेत असताना वाटेतच‎ शरदचा मृत्यू झाला. त्यामुळे उमरखेड‎ येथील शासकीय रुग्णालय दाखल केले‎ असता डॉक्टरांनी शरदला मृत घोषित‎ केले.‎ यामुळे लाइनमन नंदापुरे व चंद्रवंशी यांच्या‎ हयगय व निष्काळजीपणा मुळेच शरद‎ याचा मृत्यु झाला असून शरद याच्या‎ मृत्युला लाइनमन चंद्रवंशी व नंदापुरे हेच‎ जबाबदार असल्याची तक्रार मृत शरद‎ यांचे सासरे भिकू चव्हाण यांनी पोफाळी‎ ठाण्यात दिली. यावरून लाइनमन चंद्रवंशी‎ व नंदापुरे यांच्याविरुद्ध कलम ३०४ अ व‎ ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.‎

तीन तास मृतदेह ठाण्यात‎ शवविच्छेदनानंतर मृतदेह पोफाळी‎ पोलिस ठाण्यात तब्बल तीन तास‎ ठेवण्यात आला होता. परंतु महावितरण‎ कंपनीचा एकही अधिकारी तिकडे‎ फिरकला नाही. यावेळी मोहिनी नाईक‎ आणि रमेश चव्हाण यांच्या मध्यस्थीने‎ कुटुंबाची समजवणूक करण्यात आली.‎