आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलजीवन मिशनच्या कामाच्या उद्घाटन फलकावर पालकमंत्री व आमदारांच्या नावांसह सरपंच, उपसरपंचाच्या नावाचा समावेश करावा, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष अश्वजित भगत यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन मिशन योजना राज्यातील प्रत्येक गावांमध्ये राबवली जात असताना या कामाच्या उद्घाटन फलकावरील प्रोटोकॉलमध्ये केवळ पालकमंत्री व स्थानिक आमदारांचे नावे टाकण्यात येत आहे.
परंतु ज्या गावांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. त्या गावातील प्रमुख असणाऱ्या सरपंच व उपसरपंचांची नावे टाकली जात नाही. गावातील जनतेने आपले संवैधानिकअधिकार वापरूनसरपंच वउपसरपंचांचीनिवड केलेलीअसताना याकामाच्याफलकावरप्रोटोकॉलमध्ये त्यांची नावे टाकणे आवश्यक असताना असे होताना कुठेही दिसत नाही. त्यामुळे आपण याकडे लक्ष घालून या योजनेच्या कामाच्या उद्घाटन फलकावर प्रोटोकॉलमध्ये सरपंच व उपसरपंचांची नावे समाविष्ट करण्याचे आदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे महागाव तालुकाध्यक्ष अश्वजित भगत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.