आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना चिंता:सोयाबीनचे भाव स्थिरावल्याने‎ बाजार समितीतील आवक घटली‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेले‎ सोयाबीनचे दर कोसळले आहेत.‎ त्याचा आर्थिक फटका जिल्ह्यातील‎ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला‎ आहे. दरात घसरण झाल्याने‎ बाजारात येणाऱ्या सोयाबीनची‎ आवक कमी झालेली आहे.‎ कापसापाठोपाठच आता‎ सोयाबीनचेही दर घसरले असून,‎ गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी‎ सोयाबीनचे दर ५ हजार २०० रुपये‎ क्विंटल होते. त्यामुळे जिल्ह्यातील‎ शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला‎ असून, बहुतांश शेतकऱ्यांनी‎ भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन‎ साठवून ठेवले आहे.‎ गेल्या वर्षीचा सोयाबीनचा हंगाम‎ संपताच सोयाबीनची विक्रमी‎ भाववाढ नोंदवली गेलेली होती.

या‎ भाववाढीचा सर्वाधिक फायदा हा‎ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक‎ झाला होता. यंदा सोयाबीनला‎ चांगले दर मिळतील अशी अपेक्षा‎ शेतकऱ्यांना होती. हंगामाच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात‎ घट झालेली होती. त्यामुळे‎ शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलेले होते.‎ हळूहळू दरात सुधारणा होत गेली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सोयाबीनचे दर सहा हजार रुपयांवर‎ पोहोचलेले होते. मात्र, आता दरात‎ घसरण सुरू झालेली दिसून येत‎ आहे. गेल्या आठवड्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कापसाच्या दरातही मोठी घसरण‎ पाहावयास मिळाली. कापसानंतर‎ आता सोयाबीनचे दरही खाली‎ आलेले आहेत.

मशागतीसाठी लागलेला‎ खर्चही निघाला नाही‎ तीन एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन‎ पेरले होते.मात्र ७ पोते झाले.बाजार‎ भाव लक्षात घेता सद्या विकून‎ फायदा नाही.मशागतीसाठ ी‎ जवळपास ५० हजार खर्च‎ झाला.सोयाबीनच् या उत्पादनातून‎ मशागत खर्चही निघाला नाही.‎ - वैष्णव पाथोडे, शेतकरी,‎

बाजारतील आवक घसरली‎ गेल्या काही दिवसांपासून दरात‎ सुधारणा होत होती. मात्र, दरात‎ घसरण होत असल्याने आवक‎ मंदावली आहे.दर आणखी‎ वाढतील,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना‎ आहे.दर वाढल्यास निश्चितच‎ सोयाबीन मोठ्या प्रमाणात येण्याची‎ शक्यता आहे.‎ अजय येंडे, सचिव, बाजार समिती‎

चार दिवसात झालेली‎ सोयाबीनची आवक‎ दिनांक आवक क्विंटल‎ ३० जानेवारी- ;४३५‎ ३१ जानेवारी- ;५०२‎ १ फेब्रुवारी- बाजारतील आवक घसरली‎ गेल्या काही दिवसांपासून दरात‎ सुधारणा होत होती. मात्र, दरात‎ घसरण होत असल्याने आवक‎ मंदावली आहे.दर आणखी‎ वाढतील,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना‎ आहे.दर वाढल्यास निश्चितच‎ सोयाबीन मोठ्या प्रमाणात येण्याची‎ शक्यता आहे.‎ अजय येंडे, सचिव, बाजार समिती‎

५० ते ६० टक्के घट‎ खरिपाच्या सुरुवातीपासून पावसाने‎ आजही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला‎ नाही.यंदा जिल्ह्यात २ लाख हेक्टर‎ वरून अधिक क्षेत्रात सोयाबीनची‎ पेरणी झाली होती.त्यापैकी सुमारे १‎ लाखावर हेक्टरवरील क्षेत्राला जबर‎ फटका बसला व त्यामुळेच‎ सोयाबीनच्या उत्पादनात सुमारे ५० ते ६०‎ टक्के घट आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...