आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिनानिमित्त जगदंबा अभियांत्रिकीत कार्यशाळा‎:भारतीय स्त्रियांच्या उत्थानात डॉ.‎ आंबेडकर यांचे अमूल्य योगदान‎

यवतमाळ‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी‎ महाविद्यालयात यवतमाळ येथे ता. ९ मार्च‎ रोजी महिला दिनानिमित्य ‘भारतीय‎ स्त्रियांच्या उत्थानात डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर‎ एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन जगदंबा‎ अभियांत्रिकीचे राष्ट्रीय सेवा योजना समिती‎ व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठ,‎ अमराती यांच्या संयुक्त विद्य मानाने करण्यात‎ आले होते.‎ या कार्य शाळेची सुरुवात सावित्रीबाई फुले‎ व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण‎ व दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने झाली.‎ या कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ.‎ शितल राठोड, आर. डी. आय. के. कॉलेज‎ बडनेरा, अमरावती आणि अध्यक्ष राष्ट्रीय नारी‎ सशक्तीकरण महाराष्ट्र राज्य व महिला सुरक्षा‎ फाउंडेशनच्या सचिव डॉ. सारिका शहा होते.‎

याप्रसंगी सचिव डॉ. शितल वातीले, प्राचार्य‎ डॉ. हेमंत बारडकर, विविध विभाग प्रमुख व‎ विद्यार्थी उपस्थित होते.‎ डॉ. शितल राठोड यांनी भारतीय स्त्रियांसाठी‎ जाचक असलेल्या पुर्वापार रिती, रुढी, परंपरा‎ याविषयी विश्लेशन दिले. या सर्व रुढी,‎ परंपरेच्या जोखडातून भारतीय स्त्रियांना मुक्त‎ करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदु‎ कोड बिल रद्द करुन स्त्रियांच्या हितासाठी‎ विधवा पुनर्विवाह कायदा, बालविवाह प्रतिबंध‎ कायदा, वारसा हक्क, घटस्पोटा संबंधी‎ अधिकार, दत्तक कायदा, नोकरीमध्ये पन्नास‎ टक्के आरक्षणाचा अधिकार, मतदानाचा‎ अधिकार आदी विविध स्त्रियांसाठी हितावह‎ कायदे बनवून ते मंजुर करुन घेण्यासाठी‎ केलेल्या अत्यंत कठोर संघर्शाबद्दलची विस्तृत‎ माहीती दिली.‎ डॉ. सारीका शहा यांनी विद्यार्थ्यांना आई,‎ बहिण, मैत्रिण व समाजातील सर्व स्त्रियांचा‎ सन्मान करण्याचे आव्हान व महिलांचे विविध‎ क्षेत्रातील असलेले भरीव योगदानाचे कौतुक‎ केले.

स्त्रियांनी त्यांच्या आरोग्याविषयी कसे‎ जागृत राहावे व प्रत्येकाने अवयव दान करणे‎ गरजेचे आहे हे महत्व पटवून दिले.‎ संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले यांनी‎ समाजाच्या जडणघडणीमध्ये स्त्रियांचे‎ असलेले मोलाचे योगदान या बद्दल माहिती‎ देताना स्त्रिशक्तीच्या उदाहरणासाठी माजी‎ पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा दाखला‎ दिला.प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर यांनी‎ कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यामध्ये‎ कार्यशाळेचा उद्देश व विषय यावर प्रकाश‎ टाकला. त्यांनी पुरुष प्रदान समाजात स्त्रियांचे‎ स्थान पक्के होण्यासाठी प्रयत्न झाला पाहीजे‎ असे सांगितले.या कार्यशाळेकरीता जगदंबा‎ अभियांत्रिकी, महात्मा ज्योतिबा फुले‎ समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ,‎ सावित्री ज्योतिबा फुले समाजकार्य‎ महाविद्यालय, यवतमाळ व वाधवानी फार्मसी‎ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीत होते.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन‎ रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण‎ वानखडे यांनी केले. कार्यक्रमाच्या‎ यशस्वितेसाठी प्रा. निता चौकडे, प्रा. डॉ. मेघा‎ वसु, प्रा. वैष्णवी गिरी, प्रा. चंचल क्षीरसागर‎ यांनी विशेष परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...