आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:अदानी समूहातील आर्थिक‎ गैरकारभाराची चौकशी करा‎

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी समूहातील आर्थिक‎ गैरकारभाराची संयुक्त संसदीय‎ समितीकडे अथवा सर्वोच्च‎ न्यायालयातील मुख्य‎ न्यायाधीशांच्या देखरेखीत चौकशी‎ करण्यात यावी, अशी मागणी‎ काँग्रेस पक्षाची आहे. या‎ मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे‎ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी‎ सोमवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी स्टेट‎ बँक चौकात धरणे आंदोलन केले.‎केंद्र सरकारने जे पेरले तेच उगवले‎ आहे.

दोन-पाच वर्षांत एखाद्या‎ उद्योगपतीच्या संपत्तीत एवढी कशी‎ वाढ होते, असा प्रश्न काँग्रेस पक्षाने‎ उपस्थित केला आहे. ती कशी‎ झाली? कोणाच्या पाठिंब्याने झाली,‎ हे सगळा देश ओळखून आहे.‎ त्यांनी केलेले आता समोर आले‎ असून, त्यात समान्य माणसाच्या‎ मेहनतीचे उत्पन्न बुडण्याची भीती‎ वर्तवली जात आहे. अशा‎ उद्योगपतींनाच आता विमानतळ,‎ रेल्वे, खाणी, रस्ते, वीज केंद्रे दिली‎ जात आहेत, ही बाब चांगली नाही.‎ त्यामुळे गेल्या काही दिवसांत‎ एखाद्या उद्योग समूहातील मोठा‎ आर्थिक गैरकारभार समोर आलेला‎ आहे.

या सर्वांची सखोल चौकशी‎ करण्यात यावी, अशी मागणी करीत‎ काँग्रेसचे पदाधिकारी व‎ कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.‎ या आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष‎ शिवाजीराव मोघे, बाळासाहेब‎ मांगुळकर, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल‎ मानकर, जावेद अन्सारी, संजय‎ ठाकरे, चंदू चौधरी, रमेश‎ भिसनकर, अशोक भुतडा, विक्की‎ राऊत, स्वाती येंडे, किरण मोघे,‎ उषा दिवटे, वैशाली सवाई, दर्शना‎ इंगोले, पल्लवी रामटेके, मिनाक्षी‎ सावळकर, रूपाली मसाळ, नंदू‎ कुडमेथे, उमेश इंगळे, अरुण ठाकूर,‎ किरण कुमरे, लाला तेलगोटे, पंडित‎ कांबळे यांच्यासह पदाधिकारी व‎ कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...