आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलगडा:वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून‎ काकाने घडवले दुहेरी हत्याकांड‎, मित्रांसोबत मिळून काढला काटा, पोलिसांनी 16 तासांत लावला छडा‎

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून‎ सुरू असलेला वाद विकोपाला जावुन‎ चुलत काकाने मित्रांच्या मदतीने मिळून ‎ ‎ पुतण्या आणि त्याचा मित्राचा खून केला.‎ ही खळबळजनक घटना घाटंजी‎ मार्गावर असलेल्या कोळंबी‎ फाट्यापुर्वीच्या घाटामध्ये सोमवारी 1‎ मे रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास ‎ ‎ उघडकीस आली.

घटना उघडकीस ‎ आल्यानंतर अवघ्या 16 तासात घटनेचा ‎ ‎ उलगडा करीत आरोपींना अटक‎ करण्यात पोलिसांना यश आले.‎ अविनाश हनुमंत कटरे वय 32 वर्षे रा. चापडोह पुनर्वसन आणि उज्वल नारायण ‎ ‎ छापेकर वय २८ वर्षे रा. भोसा अशी‎ मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस ‎अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पत्रकार ‎ परिषद घेवुन माहिती दिली.

घाटंजी‎ मार्गावर कोळंबी फाट्याआधी दोन‎ व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडुन ‎ असल्याची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांना ‎ ‎ मिळाली होती. ही माहिती मिळताच‎ पोलिस अधीक्षकांसह सर्व पोलिस पथके ‎ ‎ आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी ‎ ‎ दाखल झाले. पोलिसांना घटना स्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. यावेळी‎ प्रत्येक छोट्या-छोट्या बाबी तपासुन‎ पाहण्यात आल्या. त्यात सुरुवातीस‎ मृताच्या हातावर गोंदवुन असलेल्या‎ नावावरून मृतांची ओळख पटवण्यास‎ सुरूवात करण्यात आली.

हे दोघे मृत‎ सेंट्रींग ठोकण्याचे काम करीत‎ असल्याची माहिती पहाटे पोलिसांना‎ मिळाली. त्यानंतर तपासाचा एकेक धागा‎ जोडला असता त्यांना मृत पाटापांगर गावातील असल्याचे कळले. त्यावरुन‎ पाटापांगरा गाव गाठून चौकशी केली‎ असता मृत अविनाश याच्या पाटापांगरा‎ ता. घाटंजी गावात वडिलोपार्जित‎ असलेल्या घराच्या जागेच्या‎ हिस्सेवाटनीत आलेली जागा रिकामी‎ करुन देण्याच्या कारणावरून त्याच्या‎ चुलत आजी व तीचा मुलगा विकास‎ कटरे याच्याशी वाद सुरू होता.

दरम्यान‎ मृत अविनाश हा त्याचा मित्र उज्वल‎ याच्यासोबत १ मे रोजी पाटापांगरा येथे‎ गेला होता. त्या ठिकाणी त्याने‎ आजीसोबत वाद घातला होता. त्यानंतर‎ ते यवतमाळकडे निघुन गेल्याची माहिती‎ हाती आली. याचवेळी मृताचा चुलत‎ काका विकास कटरे गावात नसल्याची‎ माहिती मिळाली. त्यावरुन संशय‎ आल्याने पोलिस पथकाने विकासचा‎ शोध सुरू केला.

दरम्यान बाभुळगाव‎ तालुक्यातील गळवा या गावातुन विकास‎ ‎ लालचंद कटरे वय २३ वर्षे रा. पाटापांगरा‎ यास ताब्यात घेण्यात आले. त्याने जागा‎ रिकामी करुन देण्याच्या कारणावरून‎ दोन मित्रांच्या मदतीने अविनाश आणि‎ उज्वल याचा खुन केल्याची कबुली‎ दिली. ही माहीती मिळताच पोलिस‎ पथकाने भारत गाडेकर आणि गजानन‎ रामराव मोरे दोघेही रा. मोहम्मदपुर ता.‎ बाभुळगाव यांना ताब्यात घेतले.‎

पिशवीतील समोशावरुन‎ मिळाली माहिती‎

घअनास्थळाची पाहणी करताना‎ मृतांच्या दुचाकीला अडवलेल्या‎ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये समोसे‎ पोलिसांना आढळुन आले. या‎ सामोशांची बांधणी एका विशिष्ट‎ पद्धतीची असुन असे समोरे घाटंजी येथे‎ विक्री करण्यात येतात याची माहिती‎ मिळाली. या समोशावरुन मृत‎ घाटंजीच्या दिशेने आले असल्याची‎ माहिती पोलिसांच्या हाती आली.‎

दुहेरी खुनाची घटना घडल्यानंतर विविध‎ पोलिस ठाणे, स्थनिक गुन्हे शाखा आणि‎ वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी‎ सांघिकपणे केलेल्या कामामुळे अवघ्या‎ काही तासात घटनेचा उलगडा होवुन‎ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. या‎ सर्व आरोपींना सायंकाळी उशीरा‎ यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात‎ देण्यात आले. या प्रकरणाचा पुढील‎ तपास आता यवतमाळ ग्रामीण पोलिस‎ करणार आहेत.‎

या पथकाने केली कारवाई‎

ही कारवाई उपविभागीय पोलिस‎ अधिकारी पांढरकवडा प्रदीप पाटील,‎ विनायक कोतते, दिनेश बैसाने, पोलिस‎ निरीक्षक प्रदीप परदेशी, लोहारा ठाणेदार‎ दीपमाला भेंडे, वडगाव जंगल ठाणेदार‎ संजय खंडारे, सहाय्यक पोलिस‎ निरीक्षक विवेक देशमुख, पोलिस‎ उपनिरिक्षक राहुल गुहे, हवालदार‎ साजीद सैय्यद, बंडु डांगे, अजय डोळे,‎ रुपेश पाली, विनोद राठोड, निलेश‎ राठोड, रितुराज मेढवे, ध्नंजय श्रीरामे,‎ चालक अमीत कुमरे, जितेंद्र चौधरी व‎ सायबर सेलच्या पथकाने पार पाडली.‎ Share with facebook