आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळाचे दुर्लक्ष‎:महागावचे बसस्थानक‎ विविध समस्यांनी ग्रासले‎ ; रस्त्याची दयनीय अवस्था

महागाव‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात‎ आलेल्या मध्यवर्ती महागावच्या‎ एसटी बसस्थानकाची अत्यंत‎ दयनीय अवस्था झाली असून याचा‎ फटका येथे येणाऱ्या प्रवाशांना बसत‎ असल्याने प्रवाशी खाजगी‎ वाहनातून प्रवास करण्यासाठी‎ प्राधान्य देत असल्याने यात‎ महामंडळास आर्थिक फटका बसत‎ आहे. बसस्थानकामध्ये प्रवेश‎ करतांना प्रवाशांना खडीचा सामना‎ करावा लागतो. रस्त्याची दयनीय‎ अवस्था होऊन खड्डे पडले असून‎ याकडे मात्र एस टी महामंडळाचे‎ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत‎ आहे.‎ महागाव तालुका निर्मिती‎ झाल्यानंतर काही वर्षे लोटताच‎ प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात‎ बसस्थानक उभारण्यात आले आहे.‎ या बसस्थानकाची देखभाल व‎ दुरुस्ती होत नसल्याने बसस्थानकात‎ येणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला समोर‎ जाण्याची वेळ येत आहे.‎ बसण्यासाठी आसन व्यवस्था व‎ पिण्याचे पाणी नसल्याने प्रवाशी‎ कंटाळून खाजगी वाहनाने प्रवास‎ करतांना दिसुन येत आहे.

एसटी‎ बसस्थानकातीलच अंतर्गत रस्त्याचे‎ डांबरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून‎ करण्यात आले नसल्याने खडी‎ उडून प्रवाशी जखमी होण्याच्या‎ घटना ही घडल्या आहे. या‎ बस्थानकातुन नागपूर, यवतमाळ,‎ आदिलाबाद, लातूर, किनवट, वर्धा,‎ माहूर, पुसद, नांदेड, पांढरकवडा,‎ बार्शी, धाराशिव या ठिकाणी प्रवाशी‎ प्रवास करतात. शिवाय‎ महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी‎ यांची सतत वर्दळ असते. अश्या‎ परिस्थितीत स्वच्छता गृहाची‎ सुविधा मात्र सलाइन वरच आहे.‎ बसस्थानकाच्या दक्षिणेकडे‎ स्वच्छता गृह असून ते अनेक‎ समस्यांनी ग्रासले आहे. त्याची‎ स्वच्छता वेळेवर होत नसल्याने‎ प्रवाशी जाणे टाळत आहे.‎ अनेकवेळा वाहतूक नियंत्रक बंडू‎ पारवेकर यांनी वरिष्ठांसह‎ लोकप्रतिनिधीकडे बसस्थानकात‎ सुविधा देण्याबाबत अनेक वेळा‎ निवेदने दिली.

पण त्या निवेदनास‎ केराची टोपली दाखविण्यात आली‎ आहे. त्यामुळे प्रवाशी उघड्यावरच‎ लघुशंका करतांना दिसत आहे.‎ सध्या कडक उन्हाळ्याला सुरवात‎ झाली असून काही महिन्यानंतर‎ पावसाळ्याला सुरवात होणार आहे.‎ बसस्थानक परिसरात साचणाऱ्या‎ डबक्यांतील पाण्याचा बंदोबस्त होणे‎ ही गरजेचे आहे. तर खड्डया मध्ये‎ पावसाळ्यात पाणी साचून तिथून‎ बस गेल्यास प्रवाशांच्या अंगावर‎ शिंतोडे उडाल्याने प्रवाशांना नाहक‎ त्रास सहन करण्याची वेळ येते.‎ त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ही निर्माण‎ होत आहे. बसस्थानकाची रचना‎ मुळातच चुकीची झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...