आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पं. स. कडून घेणार मागणी:साडेचार कोटीतून होणार‎ अल्पसंख्याक क्षेत्रातील कामे‎ ; पंचायत विभागाच्या गटविकास अधिकाऱ्यांना निधी‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील ‎ ‎ कब्रस्तान, शादीखाना यांसह इतर ‎ ‎ विकासकामांसाठी फेब्रुवारी, मार्च या दोन ‎ ‎ महिन्यात वेगवेगळ्या टप्प्यात तब्बल साडेचार ‎ ‎ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आता पंचायत ‎ ‎ समित्यांकडून निधीची मागणी घेतली जाणार ‎ ‎ असून, त्यानुसार निधी वितरित केला जाणार ‎ ‎ आहे. त्याअनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांना‎ पत्र देण्यात येणार आहे.‎ जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या‎ माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक ‎ ‎ बहुल क्षेत्रातील कब्रस्तान, संरक्षण भिंत,‎ शादीखाना आदी सोयी सुविधांच्या कामासाठी‎ ग्रामीण भागातील प्रस्ताव शासनाकडे पाठवले‎ होते.

मात्र, शासनाने वर्षभरात कुठल्याही‎ कामावर निधी उपलब्ध करून दिला नाही.‎ परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात‎ वेगवेगळ्या टप्प्यात निधी वितरीत केला‎ असून, यातून उमरखेड तालुक्यातील‎ ब्राम्हणगाव, गांजेगाव, बिटरगाव, कृष्णापूर,‎ निंगणूर, महागाव तालुक्यातील तिवरंग,‎ दारव्हा तालुक्यातील जवळा ब्र., तरोडा,‎ भांडेगाव तसेच बोरीखुर्द येथील दोन कामांचा‎ समावेश आहे. नेर तालुक्यातील आडगाव‎ (खा.), मोझर, धनज, गणोरी, ता.‎ बाभूळगाव, राळेगाव तालुक्यातील वाढोणा‎ येथील कब्रस्तान संरक्षण भिंत,‎ मस्जिदजवळील सभागृह, वडकी येथील‎ कामे आहेत.

मोहदा, ता. केळापूर,‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ डोंगरखर्डा, ता. कळंब, यवतमाळ‎ तालुक्यातील सावरगड, आकोलाबाजार,‎ मांगरूळ, वाई, वणी तालुक्यातील वांजरी,‎ कायर येथील दोन कामे, राजूर, गोवारी वा.,‎ आणि झरी-जामणी तालुक्यातील मुकूटबन‎ येथील दोन कामांचा समावेश आहे. या‎ कामासाठी पहिल्यांदा ५५ लाख, दुसऱ्या‎ टप्प्यात ७५ लाख, तिसऱ्या टप्प्यात एक कोटी‎ ५० लाख, आणि शेवटच्या चौथ्या टप्प्यात एक‎ कोटी ७० लाख, असे मिळून चार कोटी ५०‎ लाख रूपये प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या‎ निधीच्या अनुषंगाने पंचायत समितीकडून‎ मागणी घेण्यात येणार आहे. या मागणीच्या‎ अनुषंगाने पंचायत समितीच्या गटविकास‎ अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे.‎ शेवटी निधी वितरणाची कार्यवाही जिल्हा‎ परिषद पंचायत विभागाच्या वतीने केल्या‎ जाणार आहे.‎

नागरी क्षेत्रातील कामाचा निधी प्राप्त‎ जिल्हा परिषद पंचायत विभागाला प्राप्त‎ झालेल्या निधीत काही कामे नागरी क्षेत्रातील‎ आहे.यात आर्णी,केळापूर, घाटंजी येथील‎ कामाचा समावेश आहे.जिल्हा परिषद‎ प्रशासनाला प्राप्त झालेला निधी नगर पालिकेला‎ देण्यास प्रचंड अडचणी येण्याची शक्यता‎ आहे.त्यामुळे नागरी क्षेत्राचा संपूर्ण निधी शासन‎ जमा होण्याची शक्यता आहे.अन्यथा नगर‎ पालिका प्रशासनाला स्वत:पावले उचलावी‎ लागणार आहे.‎